खरं तर माझ्या मनात पाठलाग करण्याचं नव्हतं. आपल्याच आईवर संशय घेणं बरोबर नव्हतं . पण मी पडलो आता सरकारी नोकर. सरकारी नोकरीत माणुस काहीही शिकला नाही , तरी दोन गोष्टी शिकतो. एक टाळाटाळ आणि दुसरी संशय घेणं. पैकी संशय घेणं माझ्या अंगात भिनलं होतं. मी जाडकन उठलो. साधारण कपडा घातला. पायात चपला सारकवल्या. जवळ जवळ घावतच निघालो. ती दिंडी दरवाजातून बाहेर पडत होती. मी फार भराभर चालत होतो. ती मेन रोडपाशी पोचली होती. तीन साडेतीन म्हणजे काही फार रहदारीची वेळ नव्हती. तरी गर्दीत कधी कधी आई दिसेनाशी होई. ती सरळ चालत कुंभारवाड्याकडे वळली. रघुवीरांचं ऑफिसची बिल्डिंग दिसली. माझी नजर वर गेली. दुसऱ्या मजल्यावरील ती खोली सील केलेली दिसत होती. आता मला भीतीही नव्हती आणि जरूरही.
होतं. जे पाहिलं ते इतकं धक्कादायक होतं. , की माझं डोकं भणभणू लागलं. एकीकडे मला रागही आला आणि आईनी फसवल्या सारखं वाटलं. जिला आपण एवढं मानलं तिला आपला अजिबात भरवसा कसा नाही ?
घरी गेल्यावर आईला मी जाब विचारायचं ठरवलं . अर्ध्या तासात घरी आलो. सरू म्हणाली , " तु या वेळेला कुठे गेला होतास ? " मी तिला थातुर मातुर उत्तर देऊन गप्प बसवली. आईची वाट पाहू लागलो. अस्वस्थ्तेने मी येरझारा घालीत होतो. मी जाम चार्ज झालो होतो. पण आई सांगितल्या प्रमाणे सात साडे सात लाच आली. मला आश्चर्य वाटलं. मी तिथून निघाल्यावर ती कुठे गायब झाली .
मग न राहवून म्हणालो, " काय , झालं का बुवांचं निरूपण ? माझ्या बोलण्यातला खंवचटपणा तिला जाणवला नसावा किंवा ती तसं दाखवीत असावी. ती म्हणाली , " हो .... झालं की . अरे आज भजन असं रंगलं की भानच राहिलं नाही. तिच्या प्रत्येक शब्दाला माझ्या दृष्टीने वेगळाच अर्थ होता. पण ती आनंदात होती. तसे ती दाखवीत होती की काय कोण जाणे.
मग मी सरळच विचारलं, " किती दिवसांपासून हे निरूपण चालू आहे? की काही वर्ष ? तिला माझ्याबो लण्यातली खोच कळली असावी. तिचे तोंड आश्चर्याने उघडे पडले. चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, " काय बोलतोयस काय तू? कळतय का तुला ? " मी चिडून म्हणालो , " चांगलच. " ती म्ह्यणाली, " म्हणजे तू आला होतास तर. पाठलाग केलास माझा. आईवर संशय घेतोस? माझ्या नजरेला नजर न देता ती कातर स्वरात म्हणाली, " अरे , ते खरं नाही रे. " मी म्हंटलं. " काय खरं नाही?, तुझं जाणं ? त्या हरामजाद्याशी जे काही केलस ते ? " मी तिचे दोन्ही खांदे धरले रागाने हालवून म्हणालो, " तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत ? " तिचे डोळे पाझरत होते. ओठ थरथर्त होते. चोरी करताना पकडलं गेल्याचे भाव तिच्या तोंडावर होते. मी तिला सोडली. थोड्या वेळानी भानावर आल्यावर म्हणाली, " तुला सगळं सांगावच लागेल. तुला काय माहीत हे गेल्यानंतर मी पाच्सहा महिने कसे काढले ते ? काही लोकांनी तर काम देतो सांगून नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगणं फार कठीण आहे. ( माझ्या मनात आलं लोक आईला गावभवानी म्हणत) मी कशी तरी पळून आले . नंतर जी कामं मिळाली त्या पैशांतून तुमच्या फिया, कपडे रोजचं खाणंपिणं झालं असतं का? हे अधून मधून पैसे देत असत म्हणून तर सगळं चाललं. त्या बदल्यात त्यांना भेटावं लागायचं. तु आता सगळं पाहिलंच आहेस्. मी तरी कोणाकडे मनमोकळं करणार? मलाही भावना आहेत. हे तूही लक्षात घेत नाहीस . मला आई, वडील , भाऊ , बहीण कोणी नाही. मला तुझी फार भीती वाटते रे. मी ... काय करू? " बोलता बोलता ती खाली बसली. हुंदके देऊन रडू लागली. तरीही मला दया आली नाही. माझ्या डोक्यावर भूत सवार झालं होतं.
मी दात खात म्हंटलं., " म्हणजे त्या.......... बापाचंच अन्न मी खाल्लं तर. हा सोडून गेला तो त्या मुसलमान बाईबरोबर ? धर्मसुद्धा बदलेल याच्यासारखा हलकट माणूस . जिवंतपणी गाडला पाहिजे साल्याला. ती रात्र अशीच गेली. सरू तर घाबरून झोपून गेली. आई आणि मी रात्रभर बिछान्यावर बसून होतो. सकाळ झाली. डोळे जागरणानी जळत होते. मी तसाच ऑफिससाठी
तयार झालो. आईनी चहा वगैरे तयार केला. पण मी त्याला हात सुद्धा लावला नाही. उलट मी म्हणालॉ, " हे बघ, मी आता अंधेरीत फ्लॅट बुक केलाय., चार सहा महिन्यात ताबाही मिळेल. पण तू इथेच राहायचं. तुला मी नेणार नाही. (इथेच मी चूक केली. नंतर जाणवलं. )मग तो ..... बाप आणि तू घाला गोंधळ. पैसे पाठवीनच मी. असं म्हणून मी ऑफिसला गेलो. दोन चार दिवस घरी न जेवताच मी ऑफिसला गेलो. मग हळू हळू घरी जेवायला मी सुरुवात केली. आता आई घरातून हालेनाशी झाली. मी तिच्याशी पूर्णपणे बोलणं टाकलं. लागलो. ऑफिसच्या परीक्षेत मी पहिला आलो . मला आता इन्स्पेक्टरचं प्रमोशन लवकरच मिळेल.
(क्रमशः)