" माझी बहीण पण आता मोठी झालेली आहे. काही वर्षात तिच्या लग्नाचं बघायला हवं. हे प्रयत्न कोण करणार? सांग. मी काही अनुभवी नाही. तू विचारलस ना, बी. कॉम नंतर काय करणार? मी काहीच करू शकत नाही. खरं म्हणजे मला लहानपणापासून जज्ज व्हावसं वाटायच. पण त्यासाठी नोकरी सोडून काही वर्ष वकिली करावी लागेल. ते कसं जमेल? पण मला न्याय करणं फार आवडत. "
तिने मला आणि माझ्या इतर भावंडाना उठवलं. नेहेंमीप्रमाणे चहा नाश्ता केला. तिच्या तोंडावर कालच्या रात्रीचे थोडे देखिल अवशेष दिसले नाहीत. उलट तिने मला आणि दुसऱ्या दोघांना उत्साहाने तयार केले व अभ्यासाला बसवले. तिला फारस शिकवता येत नसे. पण जे पायच ते ती अगदी प्रेमाने शिकवायची. त्यामुळे आम्हाला ती फारच आवडायची. असेच दिवस गेले, आठवडे गेले, महीने गेले, वर्ष पण गेली. तू म्हणशील हे तर नॉर्मल आहे. सुरुवातीला अधून मधून काही महिने बापाकडून पैसे यायचे. नंतर नंतर मात्र ते सहासात माहिन्यानी बंद झाले. आईने वास्तव स्विकारलं असाव. पैसे येण्याचे बंद झाल्या वर आईने शेजाऱ्यापाजाऱ्यांना कमासाठी विचारल. पण तोंडावर हात थेऊन कुत्सितपणे हासत त्यांनी नकार दिला. तिची भांडी घासण्याची, स्वयंपाक करण्याची तयारी होती. पण तिला कोणी काम दिले नाही. एक दिवस आई काम शोधायला बाहेर गेली होती. आम्ही मुलं शाळेच्या तयारीत होतो. तो एक माणूस दाराशी आला. वाण्याचा नोकर असावा. तो म्हणाला, "ए तुझी आय कुठे आहे? साला तुमा लोक्ला हमेशा उधार कसा देल? आजपासून उधार बंद. मागचा एकसो छे रुपिया ने बारा आना बाकी हाय. वो जल्दी लाव, और उधारकी भीक मांगने कही और जाव. "
लवकरच आईला धुणी भांडी स्वयंपाक आणि कपडे शिवायची कामं मिळाली. पण सकाळी आमचा नाश्ता झाल्यापासून ते अगदी संध्याकाळी सात साडेसात पर्यंत कामात गुंतली. रविवार, सुटीचे दिवस तर तिला जास्तिची कामं असायची. काही लोक जास्त पैसे देत, तर काही त्याच पैशात जास्त काम कायला सांगत. पण कामं सोडण शक्य नव्हत. मध्ये मध्ये मलाही काम करावस वाटायच. पण प्रयत्न करूनही मला कोणी काम देईना. खुप वाईट वाटायच. मग मी नाद सोडला. आता मी मॅट्रिकच्या वर्गात आलो. इतर मुल क्लासेस लावीत. मला तर पुतक घेणंही मोठ मुष्किल होत. इंग्रजी, गणित विज्ञान माझ मीच केल. अधून मधून दिवेकर काका चोरून चोरून यायचे आणि दोन दोन तास शिकवायचे. ते रेल्वेमधून निव्रुत्त झालेले होते. आम्च्याशी चाळितले लोक संबंध ठेवित नसत. शिवाय आईबद्दल वाटेल ते ऐकायला यायच. त्यांच्यामते ती सकाळ पासून बाहेर जायची ते गाव भटकायला. ते तिला गावभावानी म्हणत. कळल कातुला "गावभवानी "म्हणजे काय ते? तोंडावर कोणीही बोलत नसे. नाहीतर मी त्याला मारूनच काढला असत्गा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा