Login

अश्शी सासू छान बाई...भाग -3 अंतिम

सासू सून संबंध
अश्शी सासू छान बाई.. भाग-3 अंतिम


परिस्थिती त्यांनाही माहितीच होती.
त्यांची अनुकूलता बघून
लगेच बोलणी केली आणि लगेच घरातल्या घरातच लग्नाचा निर्णय घेतला.
वसंतपंचमीचा दिवस बघून घरातच साधेपणाने लग्न उरकले. कन्यादान वीणाताईंनी केले.

दोन दिवसांनीच रथसप्तमी होती.

वीणाताईंनी 'तीळगुळाचा कार्यक्रम' आयोजित केला

रेवा म्हणाली ," आई लोकं काय म्हणतील?येतील का ?"

वीणाताई म्हणाल्या,"अगं लोकांचं काय घेऊन बसलीस.
ते दोन्हीकडून बोलतील.नाही केले तर ती बाई स्वतःच बघा कशी राहते ती सुनेला काय करु देते. तिलाही तसेच ठेवील.

केले तर तिला दुःखच नाही.काय तरी बाई तिचं वागणं म्हणून नावे ठेवतील.
रेवा सुखाने जगू द्यायचे नाहीत लोकं.
रेवा आपण आपल्याच मनाला विचारायचे मी करते ते योग्य की अयोग्य?
लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं.त्या तिच्या दुःखावर फुंकर घालत म्हणाल्या.
नवरा गेल्यावर मीनाताई डिप्रेशन मध्ये गेल्या त्यातून बाहेर यायला त्यांना कितीतरी वेळ लागला.

तेच पुन्हा रेवाच्या आयुष्यात घडू नये म्हणून त्या रेवाला हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. ती पुन्हा पुन्हा त्याच त्या विचारात गुंतून राहू नये तिला विसर पडावा म्हणून त्यांचा प्रयत्न होता.

बस्.मी तुला असे पांढऱ्या कपाळात बघू शकत नव्हते.तुला माझा विचार पटला ना.इतरांचे काय ?
जे आले त्यांचे स्वागत. नाही आले तर दुःख नाही.
तू सुद्धा मनाने पक्कं व्हावं.दुःख विसरून नवीन संसारात आनंद पेरावा हाच उद्देश.

'लोकं काय म्हणतील' चे मानगुटीवरचे भुत लवकर दूर कर.

ते करायला येणार आहेत का आपलं?शेवटी आपलं आपल्यालाच बघावे लागणार.

'अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे'

काळ हेच औषध असतं.आज अवी नाही या जगात.तो तुझी जबाबदारी माझ्या पदरात टाकून गेलाय.आई म्हणून मला जे योग्य वाटतेय ते करतेय.

तुला काय वाटते?

रेवाने सासूला... अं.. हं...आईला मिठीच मारली आणि अश्रुला वाट मोकळी करून दिली.वीणाताईंनीही तिला रडून शांत होऊ दिले.

त्यांनी त्यांच्या काॅलेजमधील मुलींना तीळगुळाच्या कार्यक्रमाला बोलावले होते.त्यांनी स्वतः रेवाला स्वतः बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांनी सजवले.
सर्व मुली आपल्या आईला,वहिनीला घेऊन आल्या.
रेवाने सर्वांना हळदीकुंकू लावून तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत तीळगुळ दिले, ओटी भरली.

बाहेर मात्र संमिश्र प्रतिक्रिया होत्या.कुणी म्हणत होते धन्य त्या वीणाताई. स्वत:चे पहाडाएवढे दुःख विसरून सुनेला नवजीवन दिलं. खूप मोठे मन लागते हो याला.
नवा पायंडा पाडला.नव्या पिढीसमोर एक आदर्श प्रस्थापित केला.

तर दुसरीकडे एक टीकेचा सूर आजकाल सुधारणेच्या नावावर काही चालतं. पोराचे जेमतेम तेरा दिवस होत नाही तर दुसरे लग्न काय,हळदीकुंकू काय... काय म्हणावे याला.
वीणाताई मात्र सगळ्यापासून अनभिज्ञ. मी नवविचाराचे बीजारोपण केलय.त्याला खतपाणी घालून वृक्षात परिवर्तित करायचं की
ते बीज तिथेच जिरवून टाकायचं हे समाज ठरवेल.
समाप्त
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all