जलद लेखन स्पर्धा जून 2025
अश्शी सासू छान बाई... भाग -1
"काय भारदस्त व्यक्तिमत्व आहे, कोण आहेत ग ह्या बाई?"
काव्या तिच्या मैत्रीणीला ज्ञानदाला विचारत होती.
" अगं, आमच्या प्राचार्य मॅडम आहेत त्या. आज इथे महिला दिनानिमित्त व्याख्यान आहे त्यांचे.
काव्या तिच्या मैत्रीणीला ज्ञानदाला विचारत होती.
" अगं, आमच्या प्राचार्य मॅडम आहेत त्या. आज इथे महिला दिनानिमित्त व्याख्यान आहे त्यांचे.
' महिलाच महिलेची शत्रू आणि महिलाच महिलेची मित्र '
या विषयावर.ज्ञानदा एका दमात बोलून गेली.
तोच काव्या पुटपुटली, " बोलायला काय पैसे पडतात? बोलणं सोपं असतं करणं कठीण. "
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
कुठे सासू सासुरवास करते तर कुठे सून बदला घेते. ही न संपणारी कहाणी.
पण प्राचार्य वीणा अपवाद होती. हे कोण सांगणार तिला. आणि ज्ञानदा ला तरी कुठे माहित होता वीणाचा पूर्वेतिहास.
या विषयावर.ज्ञानदा एका दमात बोलून गेली.
तोच काव्या पुटपुटली, " बोलायला काय पैसे पडतात? बोलणं सोपं असतं करणं कठीण. "
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
कुठे सासू सासुरवास करते तर कुठे सून बदला घेते. ही न संपणारी कहाणी.
पण प्राचार्य वीणा अपवाद होती. हे कोण सांगणार तिला. आणि ज्ञानदा ला तरी कुठे माहित होता वीणाचा पूर्वेतिहास.
आधुनिक विचारसरणीच्या वीणाताई. थोडक्यात सांगायचे तर ' साधी राहणी उच्च विचार ' चरितार्थ करणारं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व.आधुनिक तरी कसं म्हणावं ?ऐन तारुण्यात मुलगा अवी तीन वर्षांचा होता तेव्हाच काळाने घाला घातला.त्यांच्या तेजदार चेहर्याला आणखी खुलवणारं त्यांच्या कपाळावरचं
मोठ्ठं कुंकू काळाने पुसलं.त्यावेळी त्या बेशुद्धच पडल्या होत्या.नंतरही आपल्याच विश्वात राहत.त्या धक्क्यातून सावरायला काही कालावधी जावाच लागला.
मोठ्ठं कुंकू काळाने पुसलं.त्यावेळी त्या बेशुद्धच पडल्या होत्या.नंतरही आपल्याच विश्वात राहत.त्या धक्क्यातून सावरायला काही कालावधी जावाच लागला.
पण त्यांनी बघितलं मेल्यावर भलेही खांदा द्यायला चार लोकं येतील पण जिवंतपणी मदतीचे चार हात मिळणे दुरापास्तच.
अवी कडे बघून त्यांनी स्वत:ला सावरले. त्याच्यासोबत त्या
परत विद्यार्थी बनल्या आणि अथक प्रयासाने एम्.ए.इंग्लिश ची डिग्री मिळवली.प्रथम शिक्षिका आणि आता एक प्रथितयश प्राचार्या.
परत विद्यार्थी बनल्या आणि अथक प्रयासाने एम्.ए.इंग्लिश ची डिग्री मिळवली.प्रथम शिक्षिका आणि आता एक प्रथितयश प्राचार्या.
पण नवरा गेल्यानंतर त्यांनी कधीच श्रृंगार तर दूर पण साधी काठाची पांढरी सुती साडी शिवाय दुसरी वेशभूषा केली नाही.मनगटाला घड्याळ आणि एका हातात सोन्याची पाटली,गळ्यात एक सोन्याची साखळी आणि अंगठी बस.
अगदी मुलाच्या लग्नात सुद्धा सगळ्यांनी आग्रह करूनही त्यांचा पेहराव बदलला नाही.
पण त्यांचा रुबाबदार चेहरा,बोलके डोळे आणि धारदार वाणी त्यामुळे त्यांचा जनमानसावर प्रभाव होता.
अगदी मुलाच्या लग्नात सुद्धा सगळ्यांनी आग्रह करूनही त्यांचा पेहराव बदलला नाही.
पण त्यांचा रुबाबदार चेहरा,बोलके डोळे आणि धारदार वाणी त्यामुळे त्यांचा जनमानसावर प्रभाव होता.
अवीचे लग्न झाले. स्वतःची राहणी साधी असली तरी त्यांनी मुलासुनेची सगळी हौसमौज पुरवली. महिनाभर राहून
ती दोघेही आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेलीत.
ती दोघेही आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेलीत.
संक्रांत सण आला.
सुनेची पहिली तीळसंक्रांत. काय हौस वीणाताईंना.त्यांनी तिच्यासाठी स्वतः हलव्याचे दागिने बनवलेत.
हळदीकुंकू, वाणाचे सामान आणले.घर सजवले.
अवी आणि त्याची बायको रेवा बंगलोरहून गावी निघाले प्लेनने.नागपूर उतरले आणि कारने गावाकडे निघाले.रस्त्यातच अवीची छाती दुखायला लागली.
क्रमश:
बाकी पुढील भागात भाग -2 मध्ये
पुढे काय घडते ते वाचूया त पुढील भागात
©®शरयू महाजन
सुनेची पहिली तीळसंक्रांत. काय हौस वीणाताईंना.त्यांनी तिच्यासाठी स्वतः हलव्याचे दागिने बनवलेत.
हळदीकुंकू, वाणाचे सामान आणले.घर सजवले.
अवी आणि त्याची बायको रेवा बंगलोरहून गावी निघाले प्लेनने.नागपूर उतरले आणि कारने गावाकडे निघाले.रस्त्यातच अवीची छाती दुखायला लागली.
क्रमश:
बाकी पुढील भागात भाग -2 मध्ये
पुढे काय घडते ते वाचूया त पुढील भागात
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा