Login

अर्धांगिनी भाग ८

In this part malti had small burning while cooking and chandu takes care of her

अर्धांगिनी भाग ८

क्रमश: भाग ७

त्या रात्री तिघे खूप गप्पा मारत बसले . अण्णांनी चंदू आणि मालतीला दिवाळी साठी घरी बोलावले . सरपंच नेहमी चंदू ची आठवण काढत असतात  वगैरे अश्या   विषयावर  बोलणे  चालू होते .

थोड्याच वेळात अण्णांनी एक विषय चंदू जवळ काढला .

अण्णा " मी मालतिचे सर्व डी एड चे कागद आणि मार्कशीट वगैरे आणलेत. शिवाय माझ्या शाळेत ती कामाला होतीच ना तर त्याचे एक्सपेरिअन्स सर्टिफिकेट पण आणलेय . मालतीला लहान मुलांना  शिकवताना मी बघितलंय . ती  खूप चांगली शिक्षिका आहे तर जर तुम्हाला काही गैर वाटत नसेल तर तिला पण शिक्षिकेची नोकरी करता आली तर बघा . शेवटी हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे माझी काही जबरदस्ती नाही .

चंदू " तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे . मी मालतीला म्हणालो थोड्या दिवसांनी आपण तुझ्या नोकरी साठी प्रयत्न करू . तिची पण तीच ईच्छा आहे . "

अण्णा " म्हणजे तुमचं   याविषयी बोलणे  झालय  म्हणायचे .

चंदू " याच विषयां नंतर मालती माझ्याशी बोलायला लागली .. तो पर्यंत नुसते मान हलवून उत्तर द्यायची . आणि जोर जोरात हसायला लागतो . "

त्याच्या या जोक वर त्याला वाटले हे दोघे पण हसतील  पण कोणीच हसले नाही . मालती तर अण्णांचे लक्ष नसताना त्याच्याकडे बघून नाक मुरडून आत गेली . तिची हि नाक मुरडण्याची अदा पण चंदू ने पाहल्यांदाच बघितली होती .. चंदू आपला गप्पच बसला नंतर .

मग सगळे आहे त्या जागेत अड्जस्ट करत झोपले. सकाळी चंदू उठून त्याची ऑफिस ची तयारी करू लागला . अण्णांची पण गावाला जायची तयारी  सुरु होती. मालतीची मात्र धांदल चालू होती , चहा , नाश्ता , डबा करत होती .

मग चंदू डबा घेऊन अण्णांचा निरोप घेऊन ऑफिस ला गेला .  एस टी स्टॅन्ड जवळच होते त्यामुळे चंदू ने मालतीला अण्णांना स्टॅन्ड वर सोडायला सांगितले .

अण्णानां  नाश्ता करून त्यांना पोळी भाजी चा  डबा मालतीने  बांधून दिला . जाई  जाई पर्यंत अण्णा मालतीला काही ना काही तर सांगतच होते . चंदू चे गुणगान गाता गाता थकत नव्हते .

अण्णा " मालती चंदू सारखा मुलगा शोधून सापडला नसता  . कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून मला असा जावई मिळाला काय माहित . तुझ्या जन्माचे पण कल्याण झाले . आता लवकरात लवकरात एखादे मुल होऊ द्या ."

मालती " काय अण्णा .. काल  पासून तेच तेच सांगत आहात .त्यांच्या समोर तुम्ही बोलत  होतात मला किती लाज वाटत होती   "

अण्णा " मला काही कळले नाही असे वाटते का तुला ? "

मालती " काय "

अण्णा " आता हे तुझ्याशी  मी बोलणे कितपत योग्य आहे मला माहित नाही पण  पोरी मी तुझा बाप आहे "

मालती " काय कश्या बद्दल बोलताय "

अण्णा " तू खाली झोपतेस आणि  जावई वर झोपतात ना . तुझी आवडीची बेडशीट मला खालच्या वळकटीत दिसली "

मालती काहीच बोलली नाही ..

अण्णा " मी समजू शकतो. पण घरात पाळणा हलला ना कि नाते अजून घट्ट होते . बाळा च्या येण्याने नवरा बायको कायमसाठी  एकमेकांशी जोडले जातात .एकदा तुम्ही असे जोडले गेलात कि मी सुखाने मरायला मोकळा "

मालती " अण्णा ,  तुम्ही काही काळजी करू नका .. माझे आता  सुद्धा खूप छान चालू आहे . "

अण्णा ' हो ग बाई .. ते तर कळलेच मला मी काय म्हणतोय तुला कसे समजावू ?. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात . त्या दामोदर च्या मुलीचे लग्न तुझ्या आधी ४ महिने झाले आता बघ बाळंतपणाला घरी आलीय . आम्हाला पण आमच्या जवाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात ."

मालती " काय ? सवि ला दिवस गेलेत .. अण्णा माझ्या कडून अभिनंदन सांगा "

अण्णा " हूमम .."

तेवढ्यात अण्णांची गाडी आली . मालती  अण्णांची बॅग घेऊन वर चढली आणि त्यांच्या साठी एक जागा पकडली आणि मग मागून अण्णा आले . अण्णांना गाडीत जागेवर बसवून दिल्यावर मालती च्या डोळ्यात पाणी येऊ लागलं .

मालती " अण्णा परत या .. पुढल्या वेळेस आई ला घेऊन या .."

अण्णां पण भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद देत निघून गेले .

अण्णांना सोडून आल्यावर मालती चा थोडा मूड गेला होता . आता अण्णा परत  कधी भेटतील माहित नाही . पण अण्णा आले   ते बरे झाले . चंदू ने त्यांना पत्र लिहुन बोलावले होते . मालतीला पण कळत होते कि चंदू मालती चा किती विचार करतो . नुसता दोन तीनदा ती बोल बोलता म्हणाली होती कि आमचे  अण्णा असे बोलतात तर लगेच अण्णांना पत्र लिहुन  बोलावले होते .

आज मालती विचारात रमून गेली होती . तिला गावची आठवण येत होती .उघड्या डोळ्यांनी  तिने मनातून अख्खा गाव बघितला होता . एक एक मैत्रीण आठवली. मैत्रिणीनं  बरोबर केलेली मज्जा आठवली . शेवटी  ज्या गावात माणूस लहानाचा मोठा झालेला असतो  त्या गावाशी आपली नाळ जोडलेलीच असते .

आज तिच्याचाने  काही काम होई ना . संध्याकाळ झाली तरी आज ती तयार  नव्हती . ना तिने रात्रीचे जेवण करून ठेवले . चंदू संध्याकाळी घरी आला ते व्हा तिच्या लक्षात आले कि आज आपली सगळी कामे राहिलीत .

चंदू " काय म्हणत होते अण्णा जाता जाता ? गाडी मिळाली का ?"

मालती " हो . मी गाडीत  बसवूनच आले "

चंदू " मग आपण आता तुझ्या नोकरी साठी प्रयन्त करू . तुला आता शहरातील रहाणीमानाचा अंदाज पण आलाय ."

मालती चे  काम चालू होते . तिचे आज सगळे काम राहिले होते . साईड  बाय साईड  ती चंदू ला चहा देत होती . जेवणाचे बघत होती . आता जेवण बनवताना तिचा स्पीड चांगलाच वाढला होता . आता पहिल्या पेक्षा जेवण बनवण्या वर  हात बसला होता . तिला भीती वाटत होते कि आज जेवण तयार नाही म्हटल्यावर चंदू चिडेल कि काय ?

पूर्वीच्या बायकांना अशी नवऱ्याची भीती  वाटायची . नवऱ्याचे सगळे वेळच्या वेळी झालेच पाहिजे  हाच एक नियम असायचा .

चंदू  त्याचे आवरत होता आणि बोलता होता

चंदू " आज आवरले नाहीस का ? आज बाहेर नाही जायचंय का ?"

मालती " ते आज जरा उशीर झाला .."

चंदू " ठीक आहे ... मग आज नको जाऊया बाहेर .. चालेल ना "

मालती " नाही मी आवरते लगेच . "

चंदू बेड वर जरा आडवा पडला .

मालती तिचे जेवणाचे पटपट आवरायचं बघत होती पण स्टोव्ह पण एकच जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच  होता .

मालती भाकरी करत होती तर गरम तव्याचा चटका लागला .

मालती " आई ग ... अशी एकदाच बोलली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले .

खर तर कामांत लक्ष नसले किंवा  गडबड केली कि  अश्या गोष्टी घडतात . पूर्वी अर्धे ऍक्सीडेन्ट हे नवरा ओरडेल या भीतीने  होयचे .

चंदू " काय ग ? काय झाले ?

मालती " काही नाही .. जरासा चटका बसला "

तशातच चंदू ला तिने जेवण वाढले ..

मालती " ते आज जरा अण्णा गेले ना तर कामात लक्षच लागत नव्हते . तुम्ही बोलावल्यामुळे अण्णा आले म्हणून भेट झाली . "

चंदू " तूला पण घे कि जेवायला घे .

मालती"हो घेते तुमचे झाले कि जेवेन ."

चंदू " का ? आज नेहमी सारखी बरोबर का नाही बसत आहेस ?"

मालती " असेच ."

चंदू " बघू कुठे भाजलय ?"

मालती " बरं आहे .. जास्त नाही .. "

चंदू " दाखव तर ."

चंदू चे जेवण झाल्यावर शेवटी त्याने तिचे हात  बघितलेच . बऱ्या पैकी भाजले होते .

चंदू " काय ग हे .. किती भाजलय .. चंदू ने एक बटाटा कापला आणि त्यावर कापलेल्या बटाट्याची चकती ठेवली . मालतीचा थोडा दाह कमी झाला .

चंदू " अग , नाही एक दिवस जेवण झालं तर त्यात काय एवढं ? कधीतरी नुसता चहापोहे खाऊन झोपणारा माणूस आहे मी . तू त्याच एवढं टेन्शन घेतलस . "

आणि बोल बोलता त्याने जखमेवर फुंकर घालून   क्रीम लावले .

मालती काही बोलत नव्हती

चंदू " तू अजून मला ओळखले नाहीस .. याचे मला दुःख आहे . तूला वाटले   कि जेवण वेळेत नाही बनले तर बाकीच्या नवऱ्यानं सारखा मी चिडेल ."

मालती " नाही .. तसे नाही "

चंदू " नाही कसे नाही .. मगाशी मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळले जरा घाबरली आहेस "

मालती ला रडायला यायला लागले . एक तर हात भाजलाय ते दुखतंय ते वेगळे  आणि आता चंदू पण नाराज झालाय ..

मालतीच्या उजव्या  हाताची बोटे भाजली होती . त्या दिवशी चंदू ने तिला भरवले . आपला नवरा आपली आई वडीलां सारखी काळजी घेतोय हे पाहून मालतीच्या डोळे भरून येत होते.

 एक एक घास खाताना मालतीच्या डोळ्यातून अश्रू पडायचा . चंदू तिचे अश्रू पण पुसत होता आणि तिला भरवत होता . पुढे तीन दिवस चंदू ने तिला पाण्यात हात घालून दिला नाही . तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला .

जुन्या काळातील अशी किती तरी जोडपी असतील कि त्यांनी त्यांच्या बायकोला कधी  माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलले नसेल पण त्यांच्या कृतीतून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे . न बोलता  समोरच्या च्या मनातले ओळखणे हे  आणि त्याच्या मना  सारखे वागणे , काळजी घेणे  यातून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे . असेच चंदू चे मालतीचे अव्यक्त प्रेम सुरु झाले होते.

🎭 Series Post

View all