आपली माणसं...भाग 5 अंतिम
गावात संध्याकाळचा वेळ होता. शेतीवरून परतणारे शेतकरी, अंगणात पापड वाळवत असलेल्या बायका, गच्चीत खेळणारी मुलं – सगळीकडे एक सुखद गजबज होती आणि त्यात शीतलच्या आयुष्यात एक नवं गाणं वाजू लागलं होतं… आदित्यच्या रूपानं.
शीतल आणि आदित्य आता गावात एकत्रित काम करत होते – डिजिटल सुविधा केंद्र, ऑनलाइन हेल्थ चेकअप प्रकल्प, महिलांसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग. पण या सर्वांच्या पलीकडे काहीसं हळवं, काहीसं नाजूक नातं आकार घेत होतं.
एक दिवस, आदित्यने शीतलला म्हटलं –
"आपण दोघं मिळून फक्त गाव नाही घडवत… एकमेकांचं आयुष्यही सजवत आहोत."
"आपण दोघं मिळून फक्त गाव नाही घडवत… एकमेकांचं आयुष्यही सजवत आहोत."
शीतल शांतपणे हसली.
"पण आदित्य, गावातल्या माणसांचं मन जिंकणं सोपं नाही."
"पण आदित्य, गावातल्या माणसांचं मन जिंकणं सोपं नाही."
तो जवळ सरकला,
"माझा विश्वास आहे… आपली माणसं ओळखतात प्रेमाला… आणि नात्याच्या भाषेला."
"माझा विश्वास आहे… आपली माणसं ओळखतात प्रेमाला… आणि नात्याच्या भाषेला."
गावात कधीपासून कुजबुज सुरू झाली होती.
"शीतलताई आणि तो इंजिनिअर… एकत्र दिसतात बरेचदा."
पण एक गोष्ट स्पष्ट होती – कोणी विरोध करत नव्हतं.
शीतल आज त्यांच्या ‘ताई’ नव्हती, 'आपली' शीतल होती.
"शीतलताई आणि तो इंजिनिअर… एकत्र दिसतात बरेचदा."
पण एक गोष्ट स्पष्ट होती – कोणी विरोध करत नव्हतं.
शीतल आज त्यांच्या ‘ताई’ नव्हती, 'आपली' शीतल होती.
पंचायत बैठकीत मीनाने स्पष्ट सुचना दिली –
"आता या गावात शीतलचं लग्न होणार आहे – इथंच आणि तिचं घर आम्हीच उभं करणार आहोत."
"आता या गावात शीतलचं लग्न होणार आहे – इथंच आणि तिचं घर आम्हीच उभं करणार आहोत."
गावात उत्सवाची तयारी सुरू झाली.
लग्नाचं ठरल्यावर आदित्य काही दिवसांसाठी शहरात गेला. एक संध्याकाळ शीतल गच्चीत बसून जुन्या चिठ्ठ्या चाळत होती.
त्यात एक होती – ऋषीची.
त्यात एक होती – ऋषीची.
"शीतल, तू गावासाठी जे काही करू पाहतेस ते भारी आहे. पण मला ते पटत नाही. आपण वेगळ्या वाटांवर चाललो आहोत. आपुलकीने दूर जातो."
शीतल हसली.
"धन्यवाद ऋषी… कारण त्या वाटांवरूनच मी आज इथं पोचले – माझ्या माणसांत."
"धन्यवाद ऋषी… कारण त्या वाटांवरूनच मी आज इथं पोचले – माझ्या माणसांत."
लग्नाचा दिवस उजाडला.
शाळेच्या पटांगणात पांढऱ्या-पिवळ्या फुलांच्या माळा, पारंपरिक ढोल-ताशा आणि गावातले सारेजण रंगवले गेले होते.
शीतल मखमली हिरव्या नौवारीत, डोक्यावर फुलांची चंद्रकोर घेऊन उतरली… गावातली मुलं, महिला आणि सगळे शेतकरी तिच्याकडे कौतुकाने पाहत होते.
शीतल मखमली हिरव्या नौवारीत, डोक्यावर फुलांची चंद्रकोर घेऊन उतरली… गावातली मुलं, महिला आणि सगळे शेतकरी तिच्याकडे कौतुकाने पाहत होते.
पुजारी म्हणाला,
"हे लग्न फक्त दोन व्यक्तींचं नाही दोन विचारांचं आणि दोन जगांचं एकत्र येणं आहे."
"हे लग्न फक्त दोन व्यक्तींचं नाही दोन विचारांचं आणि दोन जगांचं एकत्र येणं आहे."
आदित्यने शीतलचा हात हातात घेतला आणि हळूच पुटपुटला –
"आपलं आयुष्य सुरू झालंय… आपल्या माणसांसोबत."
"आपलं आयुष्य सुरू झालंय… आपल्या माणसांसोबत."
लग्नानंतरचा एक महिना
शीतल आणि आदित्यने गावात एक "संपूर्ण आरोग्य केंद्र" सुरू केलं.
दवाखाना, आरोग्य तपासणी, मुलांसाठी पोषण योजना.
गावातल्या एका मुलीने तर नुकतीच राज्यस्तरीय डिजिटल इनोव्हेशन स्पर्धा जिंकली.
दवाखाना, आरोग्य तपासणी, मुलांसाठी पोषण योजना.
गावातल्या एका मुलीने तर नुकतीच राज्यस्तरीय डिजिटल इनोव्हेशन स्पर्धा जिंकली.
सगळीकडे एकच चर्चा –
"शीतलताई आणि आदित्यभाऊ… देवाचं देणं."
"शीतलताई आणि आदित्यभाऊ… देवाचं देणं."
शेवटी, एका कार्यक्रमात शीतल बोलली.
"जेव्हा आयुष्यातल्या अंधारात एखादा माणूस दिवा घेऊन येतो… तेव्हा तो दिवा फक्त प्रकाश देत नाही, तो घर बनतो.
माझं गाव माझं घर आहे… आणि माझ्या माणसांनी मला आयुष्यभराची दिवटी दिली आहे."
माझं गाव माझं घर आहे… आणि माझ्या माणसांनी मला आयुष्यभराची दिवटी दिली आहे."
आदित्य तिच्या बाजूला उभा होता आणि सगळ्या गावाने टाळ्यांनी गगन भरून टाकलं....
कधी वाटतं, गावाकडचं आयुष्य म्हणजे मागे जाणं. पण कधीकधी, जेव्हा आपण माणसांच्या हृदयात स्थान मिळवतो,
तेव्हा तेच आयुष्य आपण पुढे नेतो…
कानात एकच शब्द घुमतो –
"आपली माणसं"
तेव्हा तेच आयुष्य आपण पुढे नेतो…
कानात एकच शब्द घुमतो –
"आपली माणसं"
समाप्त:
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा