आपली माणसं...भाग 4
त्या रात्री शीतल एका मुलीचा प्रोजेक्ट पाहत होती. तेवढ्यात मीनाने विचारलं –
"तुझं स्वप्न पूर्ण झालं का?"
"तुझं स्वप्न पूर्ण झालं का?"
शीतल शांत हसली.
"स्वप्न पूर्ण होत नाहीत मीना… ते पेरावं लागतं… माणसांच्या मनात आणि मग ते रुजतं – आपुलकीने, संघर्षाने, आणि… आपली माणसं म्हणून."
"स्वप्न पूर्ण होत नाहीत मीना… ते पेरावं लागतं… माणसांच्या मनात आणि मग ते रुजतं – आपुलकीने, संघर्षाने, आणि… आपली माणसं म्हणून."
शीतलच्या "आपली संगणक शिक्षण योजना" यशस्वी होऊन सहा महिने झाले होते. गावातल्या मुलांनी आता छोटे प्रोजेक्ट्स, फ्रीलान्सिंग, अगदी ऑनलाइन नोकऱ्यांचीही सुरुवात केली होती. खास करून मुली आता केवळ शिक्षण घेत नव्हत्या, तर आपल्या पायावर उभं राहत होत्या.
मीनाच्या मुली – गौरी आणि चंचल – एका ऑनलाइन कोर्ससाठी निवडल्या गेल्या होत्या. त्यांचा अभिमानाने ताठ झालेला चेहरा पाहून शीतलच्या डोळ्यांत पाणी आलं.
एक दिवस, पंचायतने शीतलला सन्मानित केलं. भोसलेही यावेळी मान्य करत होता.
"कधी कधी माणसं चुकीच्या वेळेला बरोबर गोष्टी समजून घेतात. मला शीतलचा अभिमान वाटतो."
गावात आता महिलांचा एक स्वतःचा बचत गट तयार झाला होता. शीतलने त्यांना घरगुती व्यवसाय शिकवायला सुरुवात केली होती – मसाले, पापड, लोणचं, शिवणकाम. एक वेगळाच उत्साह वातावरणात पसरला होता.
पण... हळूहळू मीनाला जाणवत होतं – शीतल खूप काही करते आहे, पण तिचं स्वतःचं आयुष्य… तिला कुणी आहे का?
"शीतल, तू एवढं सगळं करत आहेस… पण तुझं स्वतःचं स्वप्न? घर? कुटुंब?"
शीतल हसली.
"माझं घर तर इथंच आहे मीना… माणसांत. पण कधी कधी रात्री विचार येतो – कोणी असावं, ज्याच्यासोबत हे सगळं शेअर करता येईल."
मीनाने एकदम विचारलं,
"तू अजून लग्न का नाही केलं?"
शीतल थोडी शांत झाली.
"करायचं होतं. कॉलेजमध्ये एक जण होता… ऋषी. खूप चांगला मित्र. त्याचं आणि माझं नातं फार वेगळं होतं. पण माझं गावासाठी काम करणं त्याला झेपलं नाही. त्याने स्पष्ट सांगितल.
'शहर सोडून गावात राहणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं'. आणि मी मागे वळून पाहिलं नाही."
'शहर सोडून गावात राहणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं'. आणि मी मागे वळून पाहिलं नाही."
त्या आठवड्यात एक गोड योगायोग घडला. गावातल्या नवीन टेलिकॉम प्रोजेक्टसाठी शहरातून एक अभियंता येणार होता – आदित्य.
पहिल्याच भेटीत आदित्यने शीतलचं काम पाहून कौतुक केलं.
"तुमच्यासारख्या माणसांमुळेच खरं बदल घडतो. मी शहरात राहतो, पण अशा ठिकाणी काम करून काहीतरी अर्थ निर्माण होतोय असं वाटतं."
शीतल आणि आदित्य यांचं बोलणं वाढू लागलं. दोघांमध्ये समान स्वप्नं, समान मूल्यं, आणि एकमेकांच्या कामाचं कौतुक होतं.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा