©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ३
पाहताच क्षणी प्रेमात पडाव इतका रिदांश आता देखणा दिसत होता. उंचपुरा, गोरापाण. हुशार, सर्वांशी मिळून मिसळून राहणारा.प्रत्येक विषय समजावून सांगताना दैनंदिन जीवनातल्या घडामोडींची उदाहरणे देत असल्यामुळे विषय चुटकीसरशी लक्षात राहू लागले.
रिदांश त्याच्या बाईकवर एका मुलीला घेवून काॅलेजला आला होता. अक्षयाला या गोष्टीचा खूप राग आला होता. आठवडाभरासाठी रिदांश बरोबर अबोला धरला. या काळात रिदांशला मात्र अस्वस्थ वाटू लागले. सतत अक्षया अवतिभवती असायची. प्रेमाने विचारपूस करायची. काय हव नको ते आपुलकीने पाहायची. या सर्वाची जाणिव होत रिदांशला आपलही अक्षयावर प्रेम जडले की काय? अस प्रश्न चिन्ह उभ राहिले होते.
शेवटी न राहवून आज अक्षया शी बोलून प्रेमाची कबूली देण्याच रिदांश ठरवतो. अक्षयला एक दिवस एकटीला पाहून रिदांश काॅलेजच्या गेटवर थांबवतो. खरतर अक्षयाला देखील रिदांश शिवाय करमत नव्हते. पण करणार काय? त्याच्या मनात नक्की काय चालू आहे समजणार तरी कसे. या करता अक्षयाने ह्या युक्तीचा वापर केला होता.
ठिक आहे म्हणत गालातल्या गालात हसत अक्षया ने प्रेम स्विकारले. रिदांश आणि अक्षया आता डेट वर जावू लागले. दोघे एकमेकांसोबत छान वेळ घालवू लागले. पिक्चर, बाहेर जेवायला जाण्याचे बेत दिवसाड किंवा आठवड्याने ठरु लागले.
रिदांश पिक्चर पाहून फिल्मी झाला असावा. तो अक्षयाला कॅडबरी, गुलाबाची फुले, ज्वेलरी, ड्रेस असे गिफ्ट देवू लागला. अक्षया प्रेमाची आठवण म्हणून जिवापाड जपत होती. अक्षया देखील रिदांशला शर्ट, वाॅलेट गिफ्ट करु लागली.
काही समजण्याच्या आतच अमेयचा मृत्यू होतो. घर कोलमडून गेल होत. अशा अवस्थेत आपल दु:ख एका बाजूला तर नव्याने बहरलेल प्रेमा च्या भेटिची उत्कंठता दुस-या बाजूला.
अशी द्विधा मन:स्थिती रिदांशची झाली होती.
वडिलांचा अचानक झालेला मृत्यू रिदांश सहन करु शकत नव्हता. अश्यातच गावावरुन काही माणसे रिदांशच्या घरच्यांना भेटायला आली. त्यात गावचा मित्र मनोज देखील आला होता. मनोजला पाहताच रिदांशला आठवण झाली ती लहान असताना गावाला भेटलेल्या त्या आठवणींची.
रिदांशला विहानचे वागणे थोडे खटकले. पण हि वेळ विरोध दर्शवणारी नाही हे जाणताच मनोजला काहि ईशारे करत रिदांश थांबवून घेतो. घरात शोकाकूल वातावरण असताना देखील रिदांश मनोजला एक हाॅटेल मध्ये राहण्याची व्यवस्था करुन देतो.
खरतर मनोजला रिदांशकडून पैशाची काही सोय होईल का? विचारने तो रिदांकडे आला होता. रिदांश त्याच क्षणी चेक देवून टाकतो. मनोजला रिदांश पैशे द्यायला इतक्या सहजासहजी तयार होईल असे वाटत नव्हते.
आई देखील दिव्याच्या हो ला हो म्हणत सून घरात आणण्याचा हट्ट धरु लागली. घरातल्यांपुढे विहानला काही बोलता येत नव्हते. सरतेशेवटी विहानचे लग्न लावण्यात येते.
दिव्या जरी घरातून गेली असली तरी सुंदराच्या रुपात सून नाहीतर मुलगीच लाभली होती. सगळे सुरळीत चालले होते. इकडे रिदांशच्या डोक्यात मात्र नको त्या विचारांनी थैमान मांडले होते. आपल्याकडे कोणाचच लक्ष नाही. आईला फक्त विहान आणि वहिनीच दिसतात.
घरच्यांना रिदांशने गावी जाणे फारसे रुचत नव्हते. पुन्हा नको त्या व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा तो गावापासून अलिप्त राहिलेलाच बरा.
एकांत वाट्याला आल्यावर रिदांशला सारखी आपल्या गावच्या मित्रांची आठवण येत होती. अखेरीस रिदांश सहलीच निमित्त काढून गावी जाण्याच्या तयारीला लागतो.
क्रमशः