"मी सांगत होतो, बाबा. नीट चौकशी करा. पण तुम्ही तेव्हा माझं ऐकलं नाहीत. घ्या आता दाखवले ना त्यांनी त्यांचे खरे रंग." अवनिश रागात डोळे मोठे करून म्हणाला.
"अरे, बाळा शांत हो आधी. तिला आधी शुध्दीवर तर येऊ दे, नेमकं काय झालं ते कळल्याशिवाय आपण नसते तर्क वितर्क काढण्यात काय अर्थ आहे?" त्याचे बाबा अजित त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाले.
"तिची अशी अवस्था त्यांच्यामुळे झाली हे माहिती असूनही तुम्ही असे कसे काय बोलू शकता? " तो त्यांचा खांद्यावरचा हात झटकत चिडून आय. सी. यू. रूममधल्या काचेतून दिसणाऱ्या तिच्याकडे पाहत भावूक होत म्हणाला.
अजितने एक कटाक्ष त्या दिशेने टाकत एक सुस्कारा टाकत मान खाली घातली.
"बोला ना आता का मान खाली घातलीत?" तो पुन्हा त्यांना जाब विचारल्यासारखं म्हणाला.
"अवि, बाळा अरे पुरे आता. आपण कुठे आहोत? याचा तरी विचार करं. आम्हालाही तिची काळजी आहे रे. जरा सबूरीने घे. तिला शुध्दीवर येऊ दे मग पाहू." त्याची आई शैला त्याला समजावणीच्या सूरात म्हणाली.
"हेच आई हेच, हेच तुमचे जे बोलणे आहे ना ते, तेच तिच्या जीवावर बेतले. तुझी शपथ, आई. तिला जर काही झाले ना, तर कोणालाच सोडणार नाही मी ! मग माझा जीव पणाला लागले तरी चालेल. हिची अशी अवस्था करणाऱ्या एकेकाला नाही दाणक्याला दिले ना तर अवनिश साळुंखे नाव लावणार नाही." तो पुन्हा रागात मुठी घट्ट आवळून दात ओठ खात म्हणाला.
शैला आणि अजित खजील होतं मुकाट्याने ऐकत होते. तो जे बोलला ते खरेच होते. त्यांनी फक्त तिच्या सासरची श्रीमंती पाहिली. बंगला, गाडी शेत पाहिले. बाकी काही पाहिलेच नाही. तिचे लग्न लावून दिले. त्यावेळी अवनिश सांगत होता ; परंतु त्याच्या सांगण्याकडे त्यांनी कानाडोळा केला. त्याचे न ऐकण्याची आता मात्र तिला किंमत चुकवावी लागली होती.
अजित व शैला यांना तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागल्या. आपली इवलीशी सानुली अख्खं घरभर चिवचिव करत असायची. फुलपाखरासारखे घरभर बागडत असायची. तिचा जन्म झाल्यावर सर्व साळुंखे कुटुंब लक्ष्मी घरात आली म्हणून जल्लोष केला होता. पहिली बेटी धनाची पेटी असे होते जणू. तिचा जन्म झाला आणि साळुंखे कुटुंबाची भरभराटीला सुरूवात झाली. तिचे सर्वजण खूप लाड करतं. ती सर्वांची लाडकी होती, तिचं नाव अनघा. छोटीशी अनघा अगदी बाहुलीसारखी दिसत होती. जसजशी ती मोठी होत गेली तसतशी ती आणखी सुंदर दिसू लागली. नकटं नाक, काळेभोर डोळे, रेखीव भुवया, थोडेसे मोठे पण धनुष्य कमानीसारखे लाल ओठ, गोल चेहरा, नीम गोरी, खांद्याच्या खाली रूळणारे काळेभोर केस, मध्यम उंची. अशी ही अनघा स्वभावाने खूपच लाघवी, शांत, समजूतदार, संयमी होती. पहिल्या नजरेत भरावं असे तिचे अनुपम सौंदर्य होते. वयात येताच तिच्या घरी लग्नाचे वेध लागले होते.
अवनिश तिचा पाठचा भाऊ. दोघांचं एकमेकांवर खूप जीव. तो तिच्यापेक्षा लहान होता तरी तिची त्याला खूप काळजी घ्यायचा. दीदी दीदी करत तो सतत तिच्या मागे मागे असायचा. तो काॅलेजमध्ये जाऊ लागला तरी त्याचे तिच्याकडे लक्ष होते.
तिचे शिक्षण चालू होते तेव्हापासूनच तिला स्थळ यायला सुरुवात झाली. तो त्याच्या आईवडिलांना नेहमी सांगायचा की तिला स्वतःच्या पायावर उभे राहू द्या मगच तिच्या लग्नाचे पाहा. तर ते तू लहान आहेस, योग्य वयात मुलीचे लग्न झालेलं चांगलं असतं नाही तर समाज नावं ठेवतं असे बोलून ते त्याला गप्प बसवत असतं.
तिचे शिक्षण चालू होते तेव्हापासूनच तिला स्थळ यायला सुरुवात झाली. तो त्याच्या आईवडिलांना नेहमी सांगायचा की तिला स्वतःच्या पायावर उभे राहू द्या मगच तिच्या लग्नाचे पाहा. तर ते तू लहान आहेस, योग्य वयात मुलीचे लग्न झालेलं चांगलं असतं नाही तर समाज नावं ठेवतं असे बोलून ते त्याला गप्प बसवत असतं.
त्याला ते पटतं नसायचे तेव्हा अनघा त्याला समजावयाची.
"भाऊ, काळजी करू नकोस रे. आईबाबा आपलं चांगल्याचाच विचार करतात आणि राहिलं लग्नाचा प्रश्न तर ते नीट चौकशी करून पाहूनच करतील ना. त्यांनाही माझी काळजी आहे रे. तू त्याचं नको टेन्शन घेऊस. तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे." अनघा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला प्रेमाने म्हणाली.
त्यावर त्याने मान डोलावली. असेच काही दिवस निघून गेले. अवनिश शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यात गेला. तेव्हा अनघासाठी सुशील साखरे ह्या बिझनेसमनचे स्थळ चालून आले होते. प्रथमदर्शनीच त्याला अनघा खूप आवडली होती. तोही दिसायला देखणा होता. बंगला, गाडी, शेत होती. एकूण काय तो एक गर्भ श्रीमंत घरातला होता. त्यात एकुलता एक मुलगा होता. त्याची थोडी फार चौकशी करता तो चांगला वाटला. त्याचे आईवडीलही चांगले वाटले. तिचे शिक्षण पूर्ण झाले होते. तिने फॅशन डिझाईनचा कोर्स केला होता. तिला स्वतःचे बुटीक काढायचे होते. थोडक्यात काय ते तिचे स्वप्न होते. जे की लग्नानंतर सुशीलने काढण्याचे आश्वासन दिले. एवढे चांगले स्थळ अजित व शैला यांना हातचे जाऊ द्यायचे नव्हते. त्यांनी जास्त विचार न करता तिचे लग्न ठरवून टाकलं.
अवनिशला कळल्यावर तो त्यांना चांगले पारखून पाहा. नीट चौकशी करून मगच पाऊल उचला असे बोलला होता. का कुणास ठाऊक त्याला सुशील नावाप्रमाणे सुशील वाटत नव्हता. त्याच्या आईबाबांनी त्याला तू काही मोडता घालू नकोस, आम्हाला चांगलं वाईट कळतं. असे म्हणत त्याला गप्प बसवले.
लग्न थाटामाटात पार पडले.
"आम्हांला काही नको. काय द्यायचे असेल तर तुमच्या मुलीला द्या. तिच्या सुखातच आमचे सुख आहे." असे म्हणत सुशीलच्या आईवडीलांनी लग्नात अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला.
"आम्हांला काही नको. काय द्यायचे असेल तर तुमच्या मुलीला द्या. तिच्या सुखातच आमचे सुख आहे." असे म्हणत सुशीलच्या आईवडीलांनी लग्नात अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला.
अजित व शैला यांनीही आपली मुलगी सुखात राहावी म्हणून दहा तोळे सोन्याचे दागिने, तिच्या नावाची पाच लाखांची एफ. डी. तील रोख रक्कम, सुशीलला सोन्याची गोफ, मोटारसायकल, महागडे घड्याळ स्वखुशीने दिले.
नव्याचे नऊ दिवस छान आनंदात गेले. चार-पाच महिन्यानंतर सुशीलच्या घरच्यांनी खरे रंग दाखवायला सुरू केले. उठता बसता तिचा व तिच्या आईवडिलांचा उद्धार करत टोमणे मारणे सुरू केले.
सुशीलही आधी बिझनेस गोत्यात चालले म्हणून तर कधी तिचे बुटीक काढायचे म्हणून गोड बोलून तिच्या आईवडिलांकडून पैसे मागून आणायला सांगू लागला. सुरूवातीला तिने आणून दिले. पण नंतर जेव्हा तिला कळले की तो सगळा पैसा जुगार खेळण्यात व दारू पिण्यात उधळत होता. तेव्हा तिने नंतर पैसे मागण्यास नकार दिला. त्यावरून त्यांचे खूपदा वाद होऊ लागले. ते वाद खूप विकोपाला गेले तेव्हा ती माहेरी निघून आली.
काही दिवसांनी सुशीलने येऊन माफी मागितली व तिला पुन्हा घरी घेऊन गेला. तिच्या आईवडिलांनाही तो माफी मागतो तर जायला सांगितले.
पुन्हा काही दिवस चांगले निघून गेले. नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे सुरू झाले. यावेळी तर त्याने तिच्यावर हात उचलला. तिला इतके मारले की ती अर्थमेली झाली होती. त्यात कळस म्हणजे तो तिला त्या अवस्थेत सोडून पसार झाला होता.
डाॅक्टरच्या हाकेने अजित व शैला भूतकाळातून बाहेर आले. ती शुध्दीवर आली होती. म्हणून त्यांनी सांगितले. तेव्हा सर्वात आधी अवनिश आत गेला. तिच्या तब्बेतेची विचारपूस करून त्याने नेमके काय झाले याची चौकशी केली.
"दीदी, तू घाबरू नकोस. जे झालं ते सगळं सांग. मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. ज्याने तुझी अशी अवस्था केली त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे." तो तिला कुशीत घेऊन डोक्यावर मायेने थोपटत म्हणाला.
त्याच्या अशा बोलण्याने तिला धीर आला आणि अन्यायाविरूध्द लढण्यासाठी बळही मिळाले.
एव्हाना पोलिस आले होते. तिची जबानी घेऊन सुशील व त्याच्या आईवडिलांवर हुंड्या घेण्यासाठी, घरेलू हिंसा असे आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेल्या सुशीलला पोलिसांनी लवकरच ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्याच्या आईवडिलांची जामिनावर सुटका झाली तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
काही दिवसांनी सुशीलवरील सर्व आरोप सिद्ध झाले. त्याला कठोर शिक्षा देण्यात आली.
अनघा आता अवनिशच्या मदतीने स्वतःचे बुटीक काढले. तिच्या कठीण काळात तिचे कुटुंब तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले खास करून तिचा भाऊ अवनिश.
समाप्त-
हुंडाबळी ठरलेल्या अनघाला न्याय मिळवून देण्यात जसे तिचे कुटुंब तिच्या सोबत उभे राहिले तसे प्रत्येक मुलीच्या कुटुंबाने तिच्या सोबत असावे.
मुलीचे लग्न ठरवताना मुलाच्या घरची श्रीमंती न पाहता तिच्या मनाची श्रीमंती पाहावी. त्याच बरोबर मुलींनीही वेळीच आपल्यावरील अन्यायाविरूध्द आवाज उठवायला हवा.
हुंडा देणे आणि घेणे कायद्याने बंदी घातली तरी का लोक ते मागतात व घेतात? कधी थांबणार हुंडाबळी?