शीर्षक -विरहाची सांजवेळ(बारोळी)
ओल्या सांजवेळी
आपले आठवे क्षण
साठवण नयनांची
व्याकूळ होते मन
आपले आठवे क्षण
साठवण नयनांची
व्याकूळ होते मन
शांतता ही न्यारी भासे
नाही होत आता ती भंग
तुझ्या विचारातच सतत
का सख्या असते मी दंग ?
नाही होत आता ती भंग
तुझ्या विचारातच सतत
का सख्या असते मी दंग ?
विरहाचा असा काळ
हा का रे संपत नाही
म्हणूनच हे अश्रूचे पाणी
त्यामुळेच सदा वाही
हा का रे संपत नाही
म्हणूनच हे अश्रूचे पाणी
त्यामुळेच सदा वाही
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा