अलक : मृत्यू.
त्याचे वडील तो लहान आसतानाच वारले होते आणि आज आई वारली. आजोबाच्या गळ्यात पडुन तो म्हणाला “ हे माझ्याच नशिबी का? ”
तेव्हा आजोबा ऐवढेच म्हणाले “ ऐक या जगाला कायद्यानी चालवे यासाठी देवानी दिल्याले वरदान म्हणजे मृत्यू आहे. जर प्रत्येक जन्मलेला मृत्यूला जिकल तर धर्म हा आधर्म होईल. जो जन्माला येेणार आहे तो आज नाही तरी उद्या जाणार आहे. त्यामुळे दुःख करु नको.”