Login

अडचण नाही आधार

बापरे नणंदे चा भारिच तोरा दिसतोय
विषय.. संसारात नणंदे ची भूमिका (भाग एक )

अडचण नाही ,आधार

भाव्यांच्या सीमाला पाहून साठ्यांच्या घरची माणसं रवाना झाली .आणि
सीमा चे आई बाबा व काकू स्थळाविषयी चर्चा करू लागले.

“ मुलगा छान आहे देखणा, सोज्वळ, संस्कारी, नोकरी ही छान आहे सीमा ची आई शोभा कौतुकाने म्हणाली”.

“त्या कोण होत्या सासुबाई बरोबर ?काकू ने विचारले?”
“बहीण होती मोठी, ताई -ताई म्हणत होते श्रीकांत त्यांना”
म्हणजे नणंद वाटतं! त्याच जास्त प्रश्न विचारत होत्या, सासु तर गप्पच होती. सीमा ची मोठी बहीण आशा म्हणाली.
लग्न झालेल्या कि —?
“काय कि ?बहुतेक लग्न झालेल्या वाटत नव्हत्या.”
बापरे म्हणजे अक्खड सासू.! आशा, सीमा ची मोठी बहीण कुत्सितपणे बोलली
ही अक्खड सासू जास्तच तेज वाटली हे शब्द ऐकल्यावर सीमा भानावर आली.
आतापर्यंत ती श्रीकांतच्याच विचारात गुंग होती. चहा देताना तिने हळूच नजर वर करून पाहिले ते गहिरे काळे भोर डोळे, श्रीकांत शीनजरा नजर झाली आणि सीमा त्यात बंदिस्त झाली.

“मग काय त्यांच्याकडून होकार असला तर आपलाही होकारच आहे ना? बाबांनी विषय आटोपता घेत विचारले?”
हे ऐकून सीमा लाजून आत पळाली…

लग्नात प्रत्येक प्रसंगी तिला नणंदबाईंची विशेष उपस्थिती जाणवली प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच घडत होती सीमाच्या मैत्रिणी ,बहिणी कुजबुल्या “बापरे नणंदेचा भारीच तोरा दिसतोय”.

!”सांभाळ ग बाई सीमा!
त्यांच्या मर्जी शिवाय तर पान ही हालत नाही दिसतय घरातलं तुमच्या.
मनात धाकधूक घेऊनच सीमाने साठ्यांच्या घराचे माप ओलांडले .सुरुवातीला ती फारशी बोलत नसे फक्त काय नी कसे हे जाणून समजून घेत होती.

श्री कडून बरेचसे समजले होते. बाबा अचानक गेले श्री आणि अशोक दोघ ही तसे लहानच. ताई नुकत्याच मॅट्रिक झाल्या होत्या .त्यांनी नोकरी धरली व संसाराचा तोल सांभाळला. पण या सगळ्यात त्यांचं वय वाढत गेलं आईने बरेचदा सुचवलं श्री आता मोठा झालाय करेल तोही काम ,तुझं लग्न व्हायला हवं पण ताईंनी मनावर घेतलं नाही. ताई होत्या म्हणून श्री च आणि अशोक च शिक्षण पूर्ण झाल ही जाणीव ठेवूनच घरात ताई म्हणेल ती पूर्व दिशा होत गेली. अर्थात त्यांच्या दृष्टीने वावगं काहीच नव्हतं, श्रीकांत ला नौकरी लागली आणि ताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.आता ताई ही घरीच असत, त्या मुलांच्या ट्यूशन घेत. घरात त्यांचं पूर्ण लक्ष असायचं.
पणसीमा ला तिने ही त्यांच्या हुकमाप्रमाणे वागावे हे काही पटत नसे.
ती श्री जवळ बोलली “अरे आता हा आपला संसार आहे मी खूप स्वप्न पाहिली आहे पण इथे पहावं तर प्रत्येक गोष्ट आधी ताईंना विचारा त्या हो म्हणाल्या तर होणार!सासूबाई तर काही बोलतच नाही.”
श्री म्हणाला अग जरा धीर धर ताई मनाने वाईट नाही आधी फार कठीण दिवस काढले त्यामुळे खर्च कराल धजत नाही.”
हो पण —बोलता बोलता सीमा थांबली.

लवकरच अशोकचे शिक्षण पूर्ण झाले. त्याला दुसऱ्या गावी नोकरी लागली, इकडे सासूबाईंची तब्येत बिघडली व त्या गेल्या.
त्यांचे दिवस वार झाले. ताई काही दिवसा करता म्हणून अशोक कडे गेल्या आता सीमाला मनासारखे स्वातंत्र्य मिळाले तिने घराची कायापालट करून टाकली बराच खर्च झाला.

ताई परतल्या घरातला बदल त्यांनी पाहिला पण काही बोलल्या नाही फक्त म्हणाल्या खर्च बराच झालेला दिसतोय”!
हळूहळू सीमा आपल्या मनाप्रमाणे वागू लागली ती ताईंना काहीच विचारत नसे घर खर्च अमाप होऊ लागला बऱ्याच वस्तू वायाही जात सुरुवातीला ताई काही बोलत नसत पण जेव्हा वारंवार होऊ लागले त्या सीमाला बोलल्या. श्रीकांत पण समजूतिच्या शब्दातच सीमा ला म्हणाला “तुला अजून अंदाज लागत नाही तर ताईला विचार”.
—-----------------------------------------क्रमश: