"हे संपलं नाहीये…" संध्या कुजबुजली.
धैर्यसिंहने शांतपणे मान हलवली. "ईशानचं मुक्त होणं ही केवळ सुरुवात होती."
ते दरवाजातून आत गेले… आणि एका जुन्या पायऱ्यांखालच्या अंधाऱ्या गुप्त दालनात उतरू लागले.
त्या पायऱ्या स्वतः आवाज करत नव्हत्या, पण प्रत्येक पायरीला एक स्मृती बांधलेली होती काही जिवंत, काही मृत.
त्या पायऱ्या स्वतः आवाज करत नव्हत्या, पण प्रत्येक पायरीला एक स्मृती बांधलेली होती काही जिवंत, काही मृत.
तुम्ही ज्यांना सोडवलंत, ते इथे कैद नव्हते… इथे अजून कुणीतरी झोपलंय… जागं होण्याच्या प्रतीक्षेत…" अचानक, अंधारातून एक खोल, अस्पष्ट आवाज घुमला
संध्याने थांबून मागे पाहिलं. पण मागचा दरवाजा हळूच बंद झाला.
"धैर्य, आता परतायचा रस्ता नाही."ती म्हणाली
. "आपण जिथे प्रकाश नेला, तिथे अंधार अस्वस्थ होतोच. पण हे शेवट असेल, असं कोणी म्हटलं?"धैर्यसिंहने तिच्या हातावर हात ठेवत म्हटल. "
"ज्यांनी एकदा भयावर मात केली, त्यांचं पुढचं शत्रू – सत्य असतं."त्या अंधाऱ्या दालनात एक नवीन भिंत उमगली तिच्यावर कोरलेलं होतं
त्या दालनातून ते दोघं पुढे सरकले. समोर एक अरुंद वाट होती, दोन्ही बाजूंनी काळसर दगडांनी बांधलेली. त्या वाटेवर, प्रत्येक पावलागणिक संध्याचं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. तिच्या मनात एक आवाज घुमत होता तिच्याच आतून.
"धैर्यसिंह… मला वाटतं काहीतरी इथे चुकीचं आहे."
"हे ठिकाण फक्त बाहेरून अंधार आहे असं नाही… हे आपल्या आतलाही अंधार उघड करतंय," धैर्यसिंहने हळू आवाजात उत्तर दिलं.
तेवढ्यात एका वळणावर समोर एक आरसा दिसला एक जुनाट, मोडकळीस आलेला आरसा. पण त्यात त्यांचं प्रतिबिंब नव्हतं त्यात दिसत होती संध्याची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यांत राग, चेहऱ्यावर घृणा… आणि अंगावर त्या काळ्या वाड्याचं निशाण.
"हे मी नाही!" संध्या किंचाळली.
"पण तू असू शकतेस… जर सत्य पचवलं नाहीस तर."
हा आवाज आरशातून आलेला नव्हता. तो तिच्या मनातला होता.
हा आवाज आरशातून आलेला नव्हता. तो तिच्या मनातला होता.
धैर्यसिंहने तिचा हात घट्ट पकडला."सत्य स्वीकारणं म्हणजे अंधारात हरवणं नाही… ते त्यावर चालत जाणं आहे."
ते आरशासमोरून पुढे सरकले. पण आता… वाट अधिकच संकुचित होत होती. आणि त्या संकुचिततेत त्यांच्या भूतकाळाच्या सावल्या त्यांच्या मागे सरकू लागल्या.भविष्यात पाऊल टाकण्यासाठी, त्यांना आता स्वतःच्या आतल्या सत्याची आणि अंधाराची संगती स्वीकारावी लागणार होती.
आरशाच्या पलीकडे जे होतं, ते केवळ एक प्रतिमा नव्हती ते संध्याच्या आत लपलेलं दुसरं रूप होतं. तिच्या आठवणींच्या तुकड्यांप्रमाणे त्या आरशातून एक एक चेहरा समोर येऊ लागला… आईचा, वडिलांचा… आणि एक अपरिचित मुलीचा, जी सतत तिच्या स्वप्नांत रडायची.
धैर्यसिंहने आरसा हातात घेतला आणि त्याला भिंतीवर आदळलं. आवाज गूंजला… पण आरसा फुटला नाही.
"हा आरसा नाही… हे एक बंद द्वार आहे," त्याने कुजबुजत म्हटलं.त्या क्षणी आरशात एक वेगळी छाया उमटली संध्याचं मृत शरीर! डोळे मिटलेले, चेहरा शांत, पण आजूबाजूला काळी धूळ आणि राख पसरलेली…
"हे… हे असं कसं शक्य आहे?" संध्या मागे सरकली.
"कदाचित तू कधीच इथून बाहेर गेलेली नव्हती… कदाचित तू त्या स्मशानाचीच एक आठवण आहेस," आवाज धैर्यसिंहाचाच होता… पण त्याच्या डोळ्यांत आता एक वेगळी चमक होती.
संध्या थरथरली. "म्हणजे मी…?"
"नाही… तू अजून आहेस. पण त्या वाड्याने, त्या स्मशानाने तुला अडकवलंय. तुझं आत्मसत्त्व जिवंत आहे… पण शरीर हरवलंय."
तिच्या पायाखालची जमीन थरथरली. अचानक तिच्या आजूबाजूला सर्व काही धूसर व्हायला लागलं. एकच आवाज सर्वत्र घुमू लागला…
तू आरशाच्या पलीकडे गेलीस… आता परतायचं नाही."
धैर्यसिंहने तिचा हात धरला, पण तो हातसुद्धा धूसर होऊ लागला.
"संध्या! तुझ्या इच्छेवर तुझं अस्तित्व टिकून आहे… विसरू नकोस!"
एक गर्जना झाली, आणि आरशाच्या आतून एक नवं द्वार उघडलं अंधारात नेणारं, पण एका आशेच्या किरणाने वेढलेलं.
संध्या पुढे चालू लागली… स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात.
संध्याच्या प्रत्येक पावलाबरोबर त्या अंधाराच्या दारातून एक वेगळी थंडी तिच्या आत खोलवर शिरत होती. तिचं शरीर हलकं होत चाललं होतं, पण तिची मनोवस्था धूसर आणि अस्वस्थ होत होती. ती जणू स्वतःचं अस्तित्व गमावत होती…
"थांब! त्या दाराच्या आत गेलीस तर परत नाही येणार!"
धैर्यसिंह तिच्या मागून ओरडत होता, "पण संध्याला आता एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं. त्या दाराच्या आतून एक बालकाचा रडका आवाज ऐकू येत होता… तोच आवाज जो अनेकदा तिच्या स्वप्नांत यायचा.
धैर्यसिंह तिच्या मागून ओरडत होता, "पण संध्याला आता एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं. त्या दाराच्या आतून एक बालकाचा रडका आवाज ऐकू येत होता… तोच आवाज जो अनेकदा तिच्या स्वप्नांत यायचा.
"आई…" – त्या आवाजाने तिचं काळीज हादरलं.
"हा… हा माझा मुलगा आहे का?" ती स्वतःशीच विचार करत पुढे सरकली.
तेवढ्यात एक क्षण असा आला की, तिच्या पुढचं आणि मागचं सर्व काही नष्ट झालं…
एक काळसर कोठी, त्यात एक झोका हलत होता… आणि झोक्यावर बसलेली ती मुलगी—तीच जी आरशात दिसली होती.
एक काळसर कोठी, त्यात एक झोका हलत होता… आणि झोक्यावर बसलेली ती मुलगी—तीच जी आरशात दिसली होती.
"तू कोण आहेस?" संध्या विचारते.
"मी? मी तुझं विसरलेलं रूप… जी त्या रात्री मृत झाली, पण आठवणीत अडकून राहिली."
"पण मी तर अजून जिवंत आहे!"
"नाही… संध्या. तू स्मशानातून बाहेर आलीस ते खरं, पण तुझं शरीर त्या रात्रीच संपलं होतं… धैर्यसिंह जे बघतोय, ते तुझं आत्मिक रूप आहे… आणि आता तू सीमारेषेवर उभी आहेस. मागे वळशील, तर भूतकाळ… पुढे गेलीस तर शाश्वत नवं अस्तित्व."
संध्याचं डोकं गरगरलं. "मला… मला माझा मुलगा हवा आहे… माझं सत्य!"
तेव्हा त्या मुलीने तिचा हात धरला, आणि संध्या त्या झोक्यावर बसली…
त्या झोक्याच्या हालचालीसोबत आजूबाजूचं वास्तव बदलू लागलं…
संध्या त्या झोक्यावर बसल्यावर झोका आपोआप पुढे-पुढे सरकू लागला. अंधार गडद होत गेला… आणि तिच्या कानात एक ओळखीचा पण विसरलेला आवाज घुमू लागला “संध्या… अजून वेळ गेलेली नाही…”
ती क्षणभर थबकली. झोक्याची हालचाल थांबली. आवाज पुन्हा आला.
“धैर्यसिंह?” ती अलगद पुटपुटली.
पण समोर धैर्यसिंह नव्हता…समोर उभा होता तो वृद्ध साधू, जो कधी काळी तिला त्या स्मशानात भेटला होता.
“तू त्याचं अस्तित्व होऊन बसली आहेस. पण आठव… तुला इथून बाहेर पडायचं आहे.”
“माझं शरीर तर संपलंय…” ती म्हणाली.
“शरीर संपलंय… पण सत्य उरलंय. आणि जेव्हाही कोणाचं सत्य अधुरं राहतं… ते स्मशानात नवा आवाज बनतं.”
तेवढ्यात, संध्या मागे वळून पाहते… आणि तिला दिसतो एक वेगळाच दृश्य धैर्यसिंह एका अंधाऱ्या कोठडीत, हतबल होऊन तिच्या आवाजाचा पाठलाग करत असतो.
“संध्या! संध्या… तू कुठे आहेस?”
त्या आवाजाने संध्याच्या अस्तित्वाला पुन्हा हलवून टाकलं.
“धैर्य! मी इथे आहे… पण माझा आवाज फक्त मृतांना ऐकू येतो…”झोक्याच्या शेंड्यावरून तिने जोरात ओरडलं
आता ती समजली होती ती धैर्यसिंहासाठी एक इशारा, एक सावली, एक चेतावणी बनून राहिली होती.
आणि स्मशानात… त्या झाडाखाली एक नवीन सावली उभी राहिली…ती संध्याची होती… पण आता ती केवळ “संध्या” नव्हती…ती होती – स्मशानातील रक्षक.
धैर्यसिंह त्या झाडापाशी पोहोचतो… तिथे एक मंद झुळूक वाहते, पण हवेत काही तरी जडसं, अनामिक असतं. जमिनीवर कोरलेलं काहीतरी त्याचं लक्ष वेधतं
"ती अजून इथेच आहे."त्या शब्दांभोवती राखेच्या ओळी, रक्ताचे हलके डाग आणि संध्याच्या हाताने लिहिल्यासारखी अक्षरं होती.
"संध्या?" त्याच्या तोंडून फक्त तिचं नावच निघतं. पण तेवढ्यात... मागे एक हालचाल होते.
एक झपाटलेली सावली धावत येते आणि झाडाच्या खाली थांबते. तिचं चेहरा अस्पष्ट, पण डोळ्यांतून झळकणारी ओळख स्पष्ट ती संध्या नव्हती, पण तिचं प्रतिबिंब होती.
कोण आहेस तू?" धैर्यसिंह विचारतो.
ती सावली थांबते. हळूच हात पुढे करते, आणि तिचा आवाज... तोच संध्याचा. पण आता त्यात एक थंडी होती.
"मी आहे ती सावली… जी आता इथल्या प्रत्येक आत्म्याची पहारेकरी आहे. तू आलास... पण परत जाणार नाहीस."
धैर्यसिंह मागे सरकतो, पण अचानक तो झाडाच्या मुळात अडकतो —आणि त्याला जाणवतं…
त्याच्या पायाखालची माती हळूहळू त्याला आत खेचू लागली आहे.
त्याच्या पायाखालची माती हळूहळू त्याला आत खेचू लागली आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा