Login

८) आत्म्याचा कैदखाना

भय कथा
धैर्यसिंह त्या उघडलेल्या प्राचीन दरवाज्यासमोर उभा होता. दरवाज्याच्या आतून येणारा मंत्रांचा गूंज आता त्याच्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप झाला होता जणू काही प्रत्येक शब्द त्याच्या नसानसांत घुसत होता.

तो एक पाऊल पुढे टाकणार, तोच त्या स्त्रीने त्याचा हात पकडला .

"एकदा आत गेलास… परत यायचं नाही, धैर्यसिंह."

, "परतीचा मार्ग आता उरलेलाच नाही…"तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला

दरवाजा ओलांडताच, एका प्रचंड अंधाऱ्या दालनात त्याने प्रवेश केला. त्या दालनाच्या मध्यभागी एक चौकट होती, जमिनीत कोरलेली ती चौकट रक्ताने भरलेली होती आणि त्याच्या भोवती मृत आत्मे शांतपणे उभे होते, जणू एखादं अंतिम यज्ञ चालू होता.

"तुझ्या रक्ताने हे पूर्ण होणार," त्यांच्या स्वरात एक अघोरी शांतता होती.

धैर्यसिंह पुढे गेला. तेव्हा एकाकडून एक आवाज घुमला
धैर्यसिंह… मागे फिर… मी चुकलो होतो! तो आवाज देवदत्तचा आत्म्याचा होता.

धैर्यसिंह थबकला. देवदत्तचा आत्मा त्या दालनाच्या एका कोपऱ्यात विझत चालला होता. त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप होता.

"मी हे दानव जागं केलं… पण अजून वेळ आहे. त्या चौकटीत पाय ठेवू नकोस…" देवदत्तची आत्मा पुन्हा म्हणाली.तेवढ्यात, दालनात अचानक वीज चमकली आणि एक नवी आकृती प्रकट झाली ती आधीच्या सर्वांपेक्षा वेगळी, अधिक प्रबळ आणि अंधारातून बनलेली.

"उशीर झालाय," हा खेळ आता संपणार… पण तुझ्या रक्ताने!"त्या आकृतीचा आवाज दालनात घुमला. "

धैर्यसिंहने डोळे मिटले, पण त्याच्या मनात आता भीती नव्हती… एक आर्त निर्धार होता.

धैर्यसिंह शांत उभा होता, आणि समोर ती अंधारातून साकारलेली आकृती भयाचं अंतिम रूप. तिच्या अस्तित्वाभोवती काळसर धुरांचा फेर घुमत होता.तिच्या हातात एक जुना, धातूचा भाला होता अग्नी आणि मृत्यूच्या मंत्रांनी भारलेला.

"तू जर पुढे आलास"तर या चौकटीतून रक्त सांडल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही."ती गुरगुरली,

धैर्यसिंहचं हृदय धडधडत होतं, पण आता त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती… एक विलक्षण स्थिरता होती.
त्याने मागे वळून पाहिलं देवदत्तचा आत्मा आता संपूर्णतः थरथरत होता, त्याच्या भोवती काळसर छाया गुंतल्या होत्या.

"माझ्या चुका तुला फेडाव्या लागतील, धैर्यसिंह… मी त्या दुष्ट आत्म्याला मुक्त केलं आणि आता हा सगळा अंधार जागा झाला!"

धैर्यसिंह पुढे झाला. त्या आकृतीच्या डोळ्यांत एक क्षणभर विस्मय उमटला.

"हे रक्त माझं आहे… पण त्याचा शेवट तुझ्या इच्छेनं होणार नाही," त्याचा स्वर दृढ होता.

क्षणात त्याने चौकटीबाहेर पडणाऱ्या एका प्रकाश वर्तुळात पाऊल ठेवलं इतक्यात मंत्रांची गूंज थांबली.
ते प्रकाश वर्तुळ त्या अंधाराशी झुंज देऊ लागलं. तेवढ्यात, आकाशातून एक आवाज घुमला जुन्या ऋषिंचा, ज्यांनी तो ग्रंथ लिहिला होता."यज्ञ त्याच्या रक्ताने होणार नाही… तर त्याच्या साहसाने पूर्ण होईल!"

आकृती गुरगुरली. तिच्या हातातील भाला अचानक जळू लागला. ती किंचाळली, आणि त्या आवाजात अंधाराचा एक मोठा भाग विरघळत गेला.

धैर्यसिंह तिथेच उभा… पण त्याचं शरीर थरथरत होतं. धैर्यसिंहच्या आजूबाजूचा प्रकाश वर्तुळ आता मंद व्हायला लागला होता. मंत्रांचा प्रभाव क्षीण होत चालला होता आणि अंधार पुन्हा त्याच्यावर झेपावत होता.
त्या क्षणी, देवदत्तच्या आत्म्याने डोळे उघडले डोळ्यांत पश्चात्तापाची ज्वाला आणि अंतिम उर्जेचा प्रकाश होता.

"धैर्यसिंह… माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी एक मार्ग आहे," तो म्हणाला, आवाज थरथरत असला तरी निश्चित होता.

धैर्यसिंहने त्याच्याकडे पाहिलं. "कसला मार्ग?"

"त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर रक्तमुद्रा उमटवावी लागेल… एका अशा आत्म्याची, जो मृत्यूला सामोरा गेला आणि तरीही पश्चात्ताप करत राहिला!"

धैर्यसिंह विचारात पडला. "मग… ती मुद्रा तूच उमटवणार?"

देवदत्त हसला, एक वेदनेने भारलेलं हसू. "

तो हळूहळू पुढे आला. देवदत्तचा आत्म्याच्या हातातून एक लखलखती रक्तलाल चमक उठली पश्चात्तापाचं तेज. त्याने ते ग्रंथ उघडलं, शेवटचं पान शोधलं आणि हात ठेवला.क्षणात एक प्रचंड वीज कडाडली. साऱ्या स्मशानावर प्रकाश पसरला. अंधार किंचाळत मागे सरकू लागला.

"हे संपव!" देवदत्तने शेवटचा शब्द उच्चारला आणि त्याचं अस्तित्व हळूहळू प्रकाशात विरलं

धैर्यसिंह त्याचं अस्तित्व विरताना पाहत राहिला. डोळ्यांत पाणी आलं होतं, पण मनात एक नवी शक्ती जागी झाली होती.पण तेवढ्यात… त्या विरलेल्याच धुरातून पुन्हा एक सावली सरकायला लागली.

"हा शेवट नव्हे…" एक खालचा, भयचकित करणारा आवाज ऐकू आला.

स्मशानाच्या मोकळ्या, धुरकट हवेत आता देवदत्तचं अस्तित्व पूर्णपणे विरून गेलं होतं… पण त्याच्या पश्चात्तापानं निर्माण झालेलं तेज अजून हवेत दरवळत होतं. मात्र, त्या उजेडाच्या मागे काहीतरी सरकत होतं काळोखात मिसळलेली एक नवी, अनोळखी छाया.

धैर्यसिंहने गालगुशीतल्या रक्ताचा एक थेंब आपल्या अंगठ्यावर घेतला आणि तो ग्रंथाच्या शेवटच्या पानावर टेकवला. पान तसंच राहिलं… शांत. काहीच घडलं नाही.

तो गोंधळला.

तेवढ्यात, मागून थंड श्वास त्याच्या गळ्याजवळ जाणवला. "तेज आणि पश्चात्ताप पुरेसे नसतात, धैर्यसिंह…" आवाज ओळखीचा होता. पण त्याच्यात आता मानवीपणाचं अंशही नव्हतं.

धैर्यसिंहने वळून पाहिलं आणि त्याचं काळीज थरथरलं.

समोरचा चेहरा देवदत्तचाच होता… पण आता त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते, चेहऱ्यावरच्या त्वचेला एक विचित्र, सडलेली छटा होती. तो हसत होता शांतपणे, पण भेसूर.

"माझं पश्चात्ताप अपूर्ण राहिलं… मी तुला सोडू शकत नाही," त्याचा आवाज आत खोलवर घुमला.

"तू… देवदत्त नाहीस!" धैर्यसिंहने ओरडलं.

"मी आहे… पण आता मी फक्त पश्चात्ताप नाही… मी त्याच्या रागाचा, त्याच्या असंतोषाचा, आणि तुझ्या कर्मांचा परिपाक आहे!"

तेवढ्यात, जमिनीखालून पुन्हा एक भेग निर्माण झाली. त्या भेगांमधून काळसर वाफ बाहेर येऊ लागली. धैर्यसिंहला स्वतःच्या पायांखालचं स्थैर्य ढळत असल्याचं जाणवलं.

"तुला तुझं उत्तर सापडलं होतं… पण प्रश्न अजून संपलेले नाहीत," छायेसारखा देवदत्त पुढे सरकत होता.

धैर्यसिंहचा श्वास धापवत होता. त्याचं शरीर थकलं होतं… पण मन अजूनही लढत होतं. समोर उभा असलेला देवदत्त आता पूर्णपणे बदलला होता त्याच्या आत्म्याच्या जागी आता काहीतरी वेगळंच होतं… एक क्रूर, वेडसर सावली.

"तू अजूनही हे समजून घेतलेलं नाहीस," त्या आकृतीचा आवाज अनेक सूरांमध्ये गुंजला एकाच वेळी रडणारा, हसणारा आणि वेदनांनी भरलेला!

धैर्यसिंहने जमिनीवर पडलेला तो निळसर शंख उचलला तो शंख जो देवदत्तच्या आत्मशांतीचा एकमेव दुवा होता. पण शंख आता गडद होत चालला होता… जणू त्याच्यावरही अंधाराचा प्रभाव झाला होता.

"तू शांत होणार नाहीस, देवदत्त… कारण आता तू तो राहिलेला नाहीस!" धैर्यसिंहने शंख उंचावला आणि संपूर्ण ताकदीने त्यावर फुंकर मारली.

एक थरथरता, चिरकलेला आवाज हवेत घुमला. पण आवाजात काहीतरी वेगळं होतं तो आवाज त्या शंखातून निघत नव्हता.

संपूर्ण स्मशान हादरलं. जणू भूमीच्या तळाशी काहीतरी जागं झालं होतं.

त्या छायेतून देवदत्तचा चेहरा वितळू लागला, आणि त्या जागी दिसू लागली एक अजून भयावह.रचना डोक्यावर असंख्य डोळे, शरीरावर कातड्याच्या जागी असंख्य जिवंत हात!

आता तुझं शरीर नाही, आत्मा बोलवेल… आणि तिथून  त्या विकृत आवाजाने म्हटलं

धैर्यसिंह डगमगला, पण त्याच्या डोळ्यात अजूनही निश्चय होता. तो कणखरपणे उभा राहिला

तो शंख पुन्हा एकदा फुंकणार इतक्यात, एक परिचित आवाज त्याच्या कानात आला.

"धैर्यसिंह… अजून आशा आहे…"हा आवाज… संध्येचा होता!

संध्येचा आवाज… त्या मृत्यूपूर्‍ण अंधारात एकमेव प्रकाशाची चाहूल होती.

"धैर्यसिंह… शंख नको, माझा आवाज ऐक… तुझा अंत:करण जागं आहे अजून!"

धैर्यसिंहने डोळे मिटले. मनाच्या गर्भात तो आवाज रुंजी घालत होता. स्मशानातील थंडी, हवेत घोंघावणाऱ्या मृत आत्म्यांचे हुंकार… हे सगळं क्षणभरासाठी विरून गेलं.

त्याच्या मनात संध्येचा चेहरा उमटला निखळ, नितळ… आणि आशेचा किरण घेऊन आलेला.

"नाही!" तो जोरात ओरडला. "मी या अंधाराचा भाग नाही… आणि देवदत्तही नव्हता!"

त्या विकृत आकृतीचा चेहरा वळवटला. "तुझं मन इतकं कमकुवत असेल असं वाटलं नव्हतं…"

त्याक्षणी जमिनीखाली काहीतरी हललं.जमिनीखालून लालसर तेज बाहेर फुटू लागलं ते तेज त्या आत्म्यांच्या काळोख्या आकृतींना स्पर्श करताच, त्या विरून गेल्या… जणू कोणी आत्म्यांना शांतता दिली!