Login

आपली माणसं जाणिव नात्याची ( भाग तीन)

वहिनी घाबरू नकोस आम्ही आहोत ना

आपली माणसं जाणिव नात्याची (भाग तीन ) अंतिम

एक दिवस तिच्या खास मैत्रिणीचा फोन” मधु आज टकलू चा पिरेड आहे बंक करूया कां? ‘साऊथ एव्हेन्यू’ वर मस्त पिक्चर लागलाय माधुरी दीक्षित चा चलायचं कां?
“हो यार तसंही तो टकलू बोरच करतो, असे म्हणून आई जवळून पैसे घेऊन मधू कॉलेजला पोहोचली.
सिनेमा पाहून बाहेर आल्यावर एका टपरीवर मुलांचा एक घोळका तिला पाहून म्हणाला ‘अरे माधुरी दीक्षित तर टॉकीज मधून बाहेर आली’ मधून तिकडे पाहिले त्या घोळक्यात एक मुलगा मात्र पुस्तकात डोळे घालून बसला होता त्याचे लक्षही नव्हते.

मधुला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या” हे बघ तो हँडसम त्याने तुला ढुंकुनही नाही पाहिले!

मधू चॅलेंज घेत म्हणाली “त्याला आपलं करून दाखवीन तरच नावाचीमधू”

बघ हा पडशील, तो स्कॉलर गरीब घरचा बच्चा, किताबी कीडा आहे!”

“ चॅलेंज? मधू न म्हटलं .”आणि लवकरच तिला तो चान्स मिळाला.
दोन दिवसांनी कॉलेजमध्ये मधे पोहोचली तेव्हा नुकताच पाऊस पडून गेला होता रस्तेवर चिखल झाला होता. पुढे मधू मागून तो हँडसम येत होता तो तिच्या चार पावलं मागे असताना मधूने पाय घसरल्यासारखे करत पडणार तेवढ्यात त्याने तिला सावरले. दोघे एकमेकांच्या मिठीत होते. काही क्षण तसेच गेले तो सावरला.

“ ओ सॉरी, तुम्ही पडणार होता.”

मधूने लाजून थँक्स म्हणत त्याच्याकडे पाहिले तोही तिच्या नजरेला नजर देत होता दोघांना जाणवल की “हम दिल दे चुके” मग भेटी गाठी वाढल्या .
त्याला एमबीए करायचं होतं त्यांनी तिला त्याच्या घरची परिस्थिती व आपल्या जबाबदारीची जाणीव आधीच दिली व मधूने तेव्हा मान्य ही केले लवकरच अशोक एमबीए झाला व त्याने स्वतः चा बिझिनेस सुरू केला. हळूहळू त्याच्या हुशारीने तो त्याने वाढवला घरच्यांच्या संमतिने त्यांनी लग्न केलं.
मधुला जरी त्यावेळी सर्व मान्य होते तरी तिला त्याच्या घरच्यांविषयी जराही सहानुभूती नव्हती. अशोक मात्र आपल्या माणसांना जोडून होता व तिलाही वेळोवेळी समजावायचा “अग ही आपली माणसं आहेत. प्रेमाची भुकेली दोन शब्द प्रेमाचे बोल त्याने नातेसंबंध टिकून राहतील प्रसंगी हेच कामाला येतिल.पण मधूने तेव्हा त्याचे बोलणे उडवून लावले..

विचार करता करता मधूच्या डोळा लागला पहाटे पहाटे दार वाजल्याचा भास होताच ती घाबरून जागी झाली.
दार उघडून पाहते तो सुरेश भाऊजी व उषावन्स दारात उभे. त्यांना पाहून तिला धक्का बसला.
उषाने तिला जवळ बसवलं व पाठीवर हात फिरवत म्हणाली “वहिनी नको घाबरू काही होणार नाही आम्ही आहोत .”
पण इतका पैसा कुठून आणू मी?मधू ने विचारले.
अगं त्याची तू काळजी सोड सुरेश म्हणाला मी सर्व व्यवस्था केली आहे.”

“ पण तुम्हाला कसे कळले?”

माझा एक मित्र याच गावात आहे त्याच्याकडून समजले की बंगला__
हो भाऊजी राजूने सर्व उधळून टाकल आणि आता कोणीही मदतीला तयार नाही.”
“ अगं असं का म्हणते? आम्ही कोणीच नाही कां? दादांनी खूप केले आमचं! आज तो नसला तरी नातं थोडी संपत प्रत्येक वेळी त्याने आम्हाला साथ दिली.
“ पण मी तुमच्याशी नेहमीच वाईट वागले तरी.
.
” जुनं सोड, रक्ताची नाती अशी तुटतात कां? उषा म्हणाली .”आपली माणसं म्हणवतो ना मग? सुरेश भाऊजींनी बंगल्यांचे कागदपत्र तिच्या हातात ठेवले व म्हणाले, राजूला पोलीसांच्या तावडीतून सोडविले आहे,थोडे दिवस मी घेऊन जातोय त्याला कामधंदा शिकवेन.
मधुला जाणवले पैशांचा ओघ संपल्यावर ती काळजीच्या रणरणत्या उन्हात उघडी पडल्यावर अशोकने मायेने जे वृक्ष सिंचले होते ते आज तिच्यावर सावली धरायला सज्ज होते.

शेवटी अशोकनी जोडलेली "आपली माणसंच" आज तिच्या मदतीला धावून आली….
—------------_—---