आजी अचानक दवाखान्यात दाखल , तीन दिवसांनंतर किमया धावतच आजीच्या कुशीत विसावली . त्या बालमनाला कुठे माहिती की आजी शेवटच्या घटका मोजत होती . डाॅक्टरांनी तर त्यांचा निर्णय सांगितला . अचानक आजी तिला न सांगता एकटीला घरी सोडून निघुन आली . त्यामुळे रुसलेली किमया आजीला भेटण्यासाठी हट्टालाच पेटली . किमयाचा आवाज ऐकताच आजीने डोळे उघडले आणि आजीचा अटकलेला जीव परत आला .
सर्वांनाच हायस वाटलं . आश्चर्याचा धक्का बसला.
"आयुष्याचे छोटे हसरे क्षण" सगळ्यांनाच आनंददायी ठरले . आजी आणि नातीच्या मिलनाची आस सर्वांना सुखद धक्का देऊन गेली .
कोणी विचारही केला नसेल कि हाय शुगर , हाय बीपी असतांनाही आणि त्यात आलेला हार्ट अटॅक .....
जिवंत राहण्याची शक्यता अगदीच कमी ....
म्हणतात ना , आयष्याची दोरी हि इतकी कमकुवत नसते . घरच्यांचा पाठिंबा , दिलासा , विश्र्वास , साथ माणसाला अनेकदा संकंटातुन पार करून देतो .
असे म्हणतात की , बालपण आणि म्हातारपण एकसारखे असते . बाल हट्ट तर आपण पुरवतो . अगदी तसेच म्हातारपणीचे असते .
आजी म्हणजे मुलांसाठी गोष्टींचा संग्रह , आजी म्हणजे मार न मिळावा म्हणून लपण्याची जागा , आजी म्हणजे प्रेमाने हातावर दिलेला छोटासा खाऊ , आजी म्हणजे मायेची उबदार रजईच जणु .......आजीचा जादुचा बटवा .......काय काय निघते त्याच्यातुन विचारायची सोय नाही .
आजीचा जीव नातीत आणि नातीचा जीव आजीत . अलगच bonding असते .
मायेचा प्रवास मांडायला शब्दच कमी पडतात . त्यासाठी अनेक गोष्टी उलगडायला शब्द अपुरे पडतील .