©️®️शिल्पा सुतार
..............
..............
पहाटे सहाचा गजर झाला, नेहमीप्रमाणे आशा दचकून उठली, सगळ्यांना जायचं असतं बाहेर, उगीच उशीर नको व्हायला माझ्यामुळे...
नवरा रमेशला ऑफिसला जायच असत , मुल मोठे झाले, मुलगा सौरभ-मुलगी सारिका दोघं नोकरीला, सगळे बिझी, घरात आशा एकटी पडली होती,....
आशालाच काही काम नसतं म्हणून सगळ घर काम तिला कराव लागायच , आशा ग्रॅज्युएट होती, पूर्वी केला होता तिने जॉब, मुलांमुळे गॅप पडला, वाचन लेखन उत्तम होत तीच....
सध्या सगळ्यांनी गृहीत धरले होत तिला, घरात जरा इकडे तिकडे झालेल चालायच नाही कोणाला, सगळ्यांनी आशाला धारेवर धरल होत , आशाला सकाळी सहाला उठावं लागायच, सगळ्यांचे डबे नाष्टा चहा रेडी ठेवायचं, आंघोळीसाठी सगळ्यांचे हिटर ऑन करून ठेवायचे, त्यांचे रोजचे घालायचे कपडे व्यवस्थित ठेवायचे,...
सगळ्यात आधी नवरा रमेश ऑफिसला जाणार, आठ ला निघायचं असलं की साडेसातला आरामशीर उठणार ते ,
"थोड आधी उठा सोबत चहा घेवू या",...... आशाने एकदा सांगून बघितल,
"सकाळी काय बोलणार? माझा आराम होत नाही",..... त्यांनी सांगितले,
रमेश कुठलीही वस्तू हाताने घ्यायचा नाहीत, आशा माझ रुमाल कुठे? पाकीट कुठे? कारची चावी कुठे? या साठी आशा लागायची, आदल्या दिवशीचा डबा सुद्धा घासायला टाकायचे नाहीत, तोही आशालाच घासायला टाकायला लागायचा...
केलेला चहा नाष्टा कसा तरी घेणार एवढ्या सकाळी उठून केलेल्या नाश्त्याला छान झाला आहे असे एकदाही न म्हणता घाईने ऑफिसला निघणार, दोन प्रेमाचे शब्द सुद्धा आशाच्या वाटेला यायचे नाहीत..... जबाबदारी आहे ही तिची तिने करायला पाहिजे, काय विशेष त्यात,
त्यानंतर सौरभ आणि सारिका नऊ नंतर ऑफिसला जायचे, दोघंही अगदी दहा मिनिटात आवरून बाहेर यायचे वडिलां सारखाच चहा नाष्टा घेतला की निघणार, बर चहा नाष्टा कसा झाला आहे ते पण नाही सांगणार, उलट यात तेल जास्त मीठ जास्त आई हा प्रकार बदल हेच कशाला करतेस, अस ऐकवायचे फक्त, सगळ्या गोष्टीचा वीट आला होता आशाला.....
सगळे कामाला गेल्यावर घर जे काही खराब करून जायचे आवरता आवरता बारा वाजून जायचे, नंतर आशाच जेवण जरा वेळ पडणं मग संध्याकाळी ती फिरायला निघायची सात वाजता घरी आली की परत संध्याकाळचा स्वयंपाक....
सगळे आठ वाजेपर्यंत घरी यायचे, घरी आले की त्या तिघांच्या गप्पा चालायच्या, आशा आपली गरम पोळ्या वाढ, सगळ्यांच्या आवडी-निवडी जप, एकाला कमी तेलाची भाजी, एकाला तिखट भाजी हेच बघत राहायची....
ती जेवली आहे का? तीची आवड-निवड काय आहे? याकडे कोणाचंच लक्ष नसायचं, सगळे फक्त मी किती हुशार आहे आणि मला किती बाहेरच्या जगाचे किती नॉलेज आहे या गप्पांन मध्ये पुढे असायचे, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं होतं तिथे, आई म्हणजे अत्यंत कमी शिकलेली आणि व्यवहार ज्ञान शून्य असलेली एक व्यक्ती होती त्या घरातली,.....
रोजचं झालं होतं ते, आशा आता दुःखी राहू लागली, कोणाला काही कल्पना नव्हती या गोष्टीची, तिच्या सासुबाई तेवढ्या नियमित फोन करून समजूत काढायच्या तिची......
दुसऱ्यादिवशी मैत्रीण रीमा कडे किटी पार्टी होती, आशा रोज प्रमाणे आवरून बारा वाजता तिच्याकडे पोहोचली, सगळ्या मैत्रिणी आल्या मनमोकळ्या गप्पा झाल्या, यावेळी मात्र सगळ्यांनी पाच दिवसाच्या पिकनिकला जायचं असं ठरवलं, लगेच डेस्टिनेशन पण ठरवलं, जवळ एका तासावर एक हिल स्टेशन होतं तिथे जायचं ठरलं, आशा ने लगेच होकार दिला आणि पैसे पण भरून टाकले, उत्साहाने आशा संध्याकाळी घरी आली छान स्वयंपाक केला
रोज प्रमाणे सगळे जेवायला बसले जो तो आपल्या गप्पा करत होतो
" मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी",.... आशा
"बोल ग आई",...... सारिका
"मी पुढच्या आठवड्यात पिकनिकला जाते आहे पाच दिवस",..... आशा
"पुढच्या वेळी जा तू आशा, मला महत्वाची मीटिंग आहे तेव्हा पण मग घरचं कसं होणार",..... रमेश
"काय व्हायचं आहे घरच, नाही तरी माझं काम काही विशेष नाही, जे मी घरी स्वयंपाक करते ते बाहेरून पण तुम्ही घेऊन खाऊ शकतात, मी सांगते आहे मी जाते आहे विचारत नाही मी जाऊ का अस ",...... आशा आज पूर्ण तयारीत होती
" पण आपल्याला पुढच्या आठवड्यात घरी जायचं होतं ना आईला भेटायला ",..... रमेश
" काही गरज नाही दोन दिवसांनी सासुबाई येणार आहेत इथे रहायला आठ-दहा दिवस, मी घरी नसताना त्यांना काही काम सांगायचं नाही, ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करायचं आणि आजीचा आई स्वयंपाक करून ऑफिसला जायचं",....... आशा
" ठीक आहे आई तू जाऊन ये ",..... सौरभ
"हो मी जाणारच आहे मी ",.... आशा
" आशा आम्हाला जाऊ की नको हे विचारण तुला कमीपणाचं वाटतं का ",..... रमेश आता चिडला होता
" नाही तसं नाही तुम्ही पण सगळे तुमचा कार्यक्रम बाहेर ठरवून येतात आणि मला फक्त सांगतात की मी उद्या इकडे तिकडे जाणार आहे तेव्हा पण मला असंच वाटतं ना, तसाच मी पण माझा कार्यक्रम ठरला ठरवला आहे, काही प्रोब्लेम आहे का ",....... आशा
उत्तराची अपेक्षा न करता आशा तिच्या रूम मध्ये निघून गेली....
दोन दिवसांनी सासुबाई आल्या, जेवण झालं आराम झालं आशाने त्यांना या घरची सगळी परिस्थिती समजून सांगितली
" हे तिघे अजिबात ऐकत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही, घरचे काम करत नाही, मला मोलकरीण करून ठेवल आहे, अजिबात कोणी विचारत नाही, नीट वागत नाही, मला डिप्रेशन च्या गोळ्या सुरु आहेत, कोणाला माहिती नाही मी गोळ्या घेते ते, मला ही कोणाला सांगावसं वाटलं नाही , मी ट्रीप नंतर तुमच्या सोबत थोडे दिवस गावी येणार आहे " ,....... आशा
सासुबाईंनी सगळ ऐकुन घेतल,....." मी बघते काय करता येईल ते, तू काळजी करू नको तू ट्रीप ची तयारी कर",..... सासुबाई
आशा दोन दिवसानी ट्रीप ला निघून गेली......
सकाळी रमेशने उठून चहा केला, सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्ले कप तसेच पडू दिले पुढे टेबल वर, तिघे तयार होऊन आले
" आजी तू दुपारी काय खाणार आहेस",...... सारिका
" तू बनवले नाही का काही? माझ्यासाठी उपमा बनव, मग जा ऑफिसला",...... आजी
"नाही आजी मला उशीर होतं आहे मी आता ऑर्डर करून देते ऑर्डर घरी येईल तू ती घेऊन घे",...... सारिका
ठीक आहे.....
जरा वेळाने कामवाली कामाला आली तिने सगळं आवरलं आणि ती निघून गेली...
संध्याकाळी तीघे घरी आले, परत बाहेरून जेवण मागवलं यावेळी सारिका ने कामवाल्या बाईला फोन केला आणि तिला उद्यापासून स्वयंपाकाला ये असं सांगितलं, तिने साफ नकार दिला त्या वेळात माझे दुसरे काम असतात मला तुमच्याकडे स्वयंपाक करायला जमणार नाही....
आता पुरता नाईलाज झाला रोज एक एकाने लवकर उठून स्वयंपाक करायचं ठरलं....
दुसऱ्या दिवशी सौरभ सारिका लवकर उठले दोघांनी कशीतरी भाजी पोळी केली....
" हे काय करून ठेवलं सारिका? सगळा पसारा आवर, तुम्हा दोघांना इतर वेळी थोडी आईला मदत करता येत नाही का? म्हणजे कामाची सवय राहील, हे काम तुमच्या दोघांकडून सुद्धा आवरत नाही, ती आशा अनेक वर्षे एक तर हे सगळं काम करते आणि तुम्हाला तिची काही किंमत नाही, साधे तुम्ही प्रेमाने ही बोलत नाही ना तिच्याशी, तुम्हाला माहिती आहे का आशा आजारी आहे ते ",..... आजी
सौरभ आणि सारिका एकमेकांकडे बघत होते, काय झाल आजी मम्मी ला....
" तुम्ही च विचारा ती आल्यावर",..... आजी
" ते काही नाही आज सगळा पसारा आवरून जा, काल तुम्ही सगळे चहाचे उष्टे कप तसेच सोडून गेले होते ती बाई घेत नाही सगळे भांडे, माझ्याकडुन एवढ आवरण होत नाही",..... आजी
सौरभ आणि सारिकाला आवरता आवरता पुरेवाट झाली....
संध्याकाळी रमेश ने खिचडी केली त्यांनाही आजीने खूप रागावले,....." तु ज्या पद्धतीने काम करतो ना त्यावरून असं वाटत आहे की तु घरात कधीच कुठल्या कामासाठी मदत केलेली दिसत नाहीये, बरोबर आहे म्हणा तु कामावर जाणारा, घरची कामं करणे, घरच्यांबरोबर वेळ घालवण हे तुला कमीपणाचं वाटतं",...
"काय झाल आई, अस का बोलतेस",.... रमेश
"आशाला का गरज वाटली मैत्रिणींबरोबर बाहेर जायची कारण तुम्ही घरचे लोकं तिला वेळ देत नाही वर्षानुवर्षे ती घरातच असते तुमच्या लोकांचा स्वयंपाक करत, त्याबदल्यात तुम्ही लोकं काय देतात तिला? तू जेव आमच्यासोबत अस सुद्धा म्हणत नाही, ती आजारी आहे हे माहिती आहे का तुला"?,...... आजी
रमेश बघत राहिला....." काय झाल आई आशा ला, ती काही बोलली नाही ",...
" तिला डिप्रेशन चे औषध सुरू आहेत",...... आजी
" आता बघितलं स्वयंपाक करणं किती अवघड आहे, रोज एवढे छान छान पदार्थ करून ती तुम्हा सगळ्यांना देते, छान झाला आहे स्वयंपाक अस सुद्धा तुम्ही तिला म्हणत नाही, ती माझी सून आहे पण एका बाईचं त्रास काय असतो ते मला बरोबर माहिती आहे, यापुढे तुम्ही लोक पण तिच्याशी नीट वागाल अशी आशा करते",..... आजी
सौरभ सारिका, रमेश एकमेकांन कडे बघत होते......
" आशा ट्रीप हून आली की मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल थोडे दिवस गावी, तिला छान राहू द्या माझ्या सोबत, राहा तुम्ही तिघे एकटे इथे",....... आजी
" आजी मम्मीला घेऊन जाऊ नकोस हे असं मम्मी शिवाय जगणं कठीण आहे आम्ही तिला गृहितच धरलं होतं असं काही नाही की आमचं प्रेम आहे नाहीये तिच्यावर पण एवढेच की तिच्याकडे लक्ष देत नव्हतो",..... मूल
" माझ पण चुकलंच आहे जरा, मी आता वेळ देत जाईन आशाला, तिला मदत करत जाईल ",...... रमेश
आशा ट्रीप हून आली आल्या आल्या सारिका आणि सौरभ गळ्यात पडले,....." मम्मी तू नव्हती तर अजिबात करमत नाही आम्हाला प्लीज यापुढे आम्हाला सोडून जात नको जाऊस",
आशाने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते तिकडे काय काय एन्जॉय केल ती भरभरून बोलत होती
" मम्मी तुझी भाषा किती समृध्द आहे , तू लिखाण का करत नाहीस, मी मदत करेन तुला, तू सुरू कर लिखाण",....... सारिका
रमेश ही आशा घरी आल्यामुळे खुश दिसत होते, संध्याकाळी आशाने स्वयंपाक करायला घेतला, सौरभ आणि सारिका मदतीला आले सगळ्यांनी हास्यविनोद करत जेवण केलं
"मी उद्या निघते गावाकडे जायला",...... आजी
" थांबा ना थोडे दिवस आई तू",.... रमेश
आशा येणार आहेस माझ्यासोबत घेवून जाते 8-10 दिवस
रमेश सौरभ सारिका एकमेकांकडे बघायला लागले,
"आशा येईल माझ्यासोबत नंतर रमेश तु तिला घ्यायला ये",..... आजी
"चालेल जाऊन ये आशा ",.... रमेश
आशा गावाला राहून आली, आता व्यवस्थित चालला आहे त्यांचं, मुलं प्रेमाने वागता आहेत, ती आणि रमेश सकाळचा चहा तरी एकत्र घेतात आशाच्या तब्येतीत बराच फरक पडला आहे, ती आता स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते, थोड लिखाण सुरू केल आहे तिने,.....
मानसिक आधार गरजेचा आहे प्रत्येक व्यक्ति ला, जास्त अपेक्षा नाही पण जेवढा वेळ मिळेल तेवढ् तरी एकमेकांशी चांगल बोलायला हव वागायला हव, एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा आधार बनायला हवा एकमेकांचा , समजून घ्यायला हव, शारीरिक आजार पेक्षा मानसिक आजार घातक असतो, घरातील स्त्रिया ना समजून घ्या, त्यांना ही प्रेमाची गरज असते, दिवसातून थोडा वेळ त्यांना द्या.....