आई...
शांता आपल्या संसारात भलतीच खूष होती.....नवऱ्याचा चांगला बीजनेस होता.... दोन दोन मुलं होती.... सगळे सगळे व्यवस्थित होत.... मोठा मुलगा चवथीच्या वर्गात तर लाहन मुलगा दुसरीच्या वर्गात होता.....शांता समाधानीं होती.... फक्त तिला एकच कुणकुण होती की, आपल्याला एक मुलगी असती तर फार बरं झाल असते.... बस... ही एक गोष्ट सोडली तर शांताच्या जीवनात आनंदी आनंद होता.....
म्हणतात ना आनंद आणि सुख फार काळ जीवनात टिकत नाही..... तसंच काहीस शांताच्या बाबतीत झाल....मोठा मुलगा मोहन हा चवथी पास झाला... तसा..त्याला बाहेर चांगल्या बोर्डिंग स्कूल मध्ये टाकू.... . असा निर्णय शांताच्या पतीने घेतला..... शांताचा पती हुशार होता मात्र कमी शिकलेला होता.... आपल्या मुलांनी भरपुर शिकावं अशी त्याची मनोमन ईच्छा होती ......शांताची देखिल तीच इच्छा होती..... मात्र इतक्या लहान वयात मोहनला आपल्यापासुन दूर ठेवणे तिला बरं वाटत नव्हते..... मात्र तिचा नाईलाज होता..... तसही आपला मुलगा शिकून मोठा होईल यांत वाईट ते काय? ....त्यामुळे तिला पतीचा निर्णय योग्य वाटला .....
जड मनाने तयारी करून मोहनला शांताने बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवले... तशी शांता चांगली शिकलेली होती तीच इंग्रजी गणित तर फारच चांगले होते... ती मोहनला चांगले इंग्रजी घरी देखिल शिकवू शकत होती... मात्र होस्टेलला मुलं स्वावलंबी होतात अस तिच्या पातीच म्हणण होत..... परत तो चांगले कमावत होता त्यामुळे स्टेटस हा एक भागही त्याच्या साठी होताच......
कालांतराने लहान मुलगा माधव याला ही चवथी नंतर त्याच बोर्डिंग स्कूल मधे टाकले... आता मात्र शांता घरात एकटी पाडली..... तिला वेळ घालवण्यासाठी नोकरी करायची इच्छा होती मात्र पतीचा याला सक्त विरोध होता.... ..आता माधव देखिल शाळेत गेल्याने तिला बराच मोकळा वेळ मिळे..... तो वेळ ती चांगली पुस्तके वाचण्यात घालवी...
दिवस चालले होते.... शांताची मुलं आता मोठी लग्नाची झाली होती.... कालांतराने दोन्ही मुलांची लग्न झाली.... घरात दोन दोन सुना आल्या.... सुरवातीस सगळं ठीक होत... मात्र काही कालावधीतच दोन्ही सुनानी आपला रंग दाखवायला सुरवात केली.....घरात आता रोज कीटकिट व्हायला लागली... दोन्ही सुनांना त्यांचा वेगळा संसार हवा होता.... यातच अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे शांताच्या पतीचे अपघाती निधन झाले.... त्यामुळे शांता काहीशी एकटी पाडली कारण तीची दोन्ही मुलं त्यांच्या बायकांची गुलाम होती.... त्यामुळे शांताला घरात फारच त्रास होत होता..... पतीच्या निधनानंतर तर तिला जगणे अगदी नकोस झाल होत......
त्या कठीण काळात कहर म्हणजे दोन्ही मुलांनी घराची वाटणी करण्याचा निर्णय घेतला.... आपल्या बायकांच्या दुष्ट स्वभावामुळे दोन्ही मुलं शांताला आपल्या जवळ ठेवायला तयार नव्हती.... त्यामुळे दोघांनीही आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला.... त्यांचे म्हणणे अस होत की, आई तु आम्हांला लहानपणी अजिबात प्रेम केले नाहीस.... त्यामुळे तुम्ही आम्हांला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवले..... आता तु देखिल वृद्धाश्रमात रहा....मुलांच्या या बोलण्याने शांतावर दुःखाचा डोंगर कोसळला..... कारण तीने तिच्या मुलांना भल्यासाठी बोर्डिंग स्कूल मध्ये काळजावर दगड ठेऊन.... ठेवले होते..... आज तीच मुलं त्याचा वचपा म्हणुन केवळ आपल्या बायकांच्या सांगण्या वरून तिला घराबाहेर काढून वृद्धाश्रमात ठेवणार होते....
शांता रात्री खुप विचार करत होती... उद्या वृध्दाश्रमात जाव लागणार?..... आपल्या पतीने इतक्या मेहनतीने बांधलेले घर सोडावे लागणार...... वर्षानुवर्षे ज्या घरात राहिलो ते घर उद्या सोडव लागणार..... आणि एकदा का वृध्दाश्रमात गेलो की, तेथुन परत फिरणे अशक्य..... त्यामुळे आपण भावाकडे जाऊन त्याला शेती व घरकामात मदत केली तर आपल्या दोन वेळच्या जेवणाचा आणि राहण्याचा प्रश्न सुटेल.... तसा दादा आणि वहिनीचाही स्वभाव आपल्या सुना पेक्षा किती तरी चांगला आहे..... ते मला नाही सांगणार नाही.... असा विचार करून शांताने आपले मोजकेच सामान ऐका पिशवीत भरले... व निघाली....
रात्रीचे साडे दहा झाले होते.... गावाकडे जायला शेवटची अकराची एसटी होती....मोहन व माधव त्यांच्या बायकांसोबत त्यांच्या खोलीत होते...त्यामुळे ...... ती कसलाही आवाज न करता घराबाहेर पडली...,..
अंगणात जाऊन एक नजर तिने आपल्या घरावर फिरवली... घराकडे पाहताना तिला गहिवरून आले..... इतके वर्षापासुन त्या घरासोबत असणारे नाते आज तुटणार होते.... आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत तीने पिशवी उचलली व घाईत निघाली.... कारण अकराची शेवटची एसटी होती......
शांता बस स्टेंड कडे घाई घाईत चालली होती... कारण वेळ फार कमी होता... . तिच्या डोक्यात आधिच विचारांचे काहूर माजले होते... त्यांत एसटी पकडण्याची घाई.,... तिने रस्ता ओलांडताना फारसे लक्ष दिले नाही.... त्यामुळे ऐका कारने तिला धडक दिली..... शांता रस्त्याच्या बाजुला पाडली..... तिच्या डोक्यातुन भळाभळा रक्त वाहायला लागले.... त्यामुळे ती बेशुद्ध झाली......
मावशी! कस वाटतंय तुम्हांला?..... शांता काहीशी शुद्धीवर आली होती.... तिने थोडी मान हलवली.... मी मीरा आणि हे माझे मिस्टर समीर !...... आमच्या गाडीची धडक लागली तुम्हांला त्यामुळे आम्ही तुम्हांला या हॉस्पिटल मधे घेऊन आलोय.....तुम्ही काळजी करु नका आम्ही हॉस्पिटलचा सर्व खर्च करु!....आणि तुम्हांला काय असेल तो मोबदला देखिल !....मीरा बेडवर झोपलेल्या शांताला सांगत होती......
मावशी तुमच्या घरचा पत्ता द्या आम्ही कळवतो तुमच्या घरच्यांना.... डॉक्टरांनी संगितलेय तुमच्या डोक्याला मार लागल्यामुळं बरंच रक्त गेले... तुम्हांला अजुन पाच सहा दिवस तरी येथे राहावे लागेल...... मीरा हे सगळं बोलत होती.... मात्र शांता तिच्या कडे शून्य नजरेने पाहत होती.... मीरा परत म्हणाली... मावशी तुमचा पत्ता देताय ना?.....
मला काहीच आठवत नाही..... शांता जेमतेम बोलली..... मीरा समजली या मावशीच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यानां काही आठवत नसाव.....ती डॉक्टरांना भेटली...... त्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यामुळे त्यांना काहीसा शॉक बसलाय.... काळजी करण्या सारखे काही नाही... होतील त्या रिकव्हर।डॉक्टर मीराला समजावत म्हणाले...
चारपाच दिवस झाले..... शांताला आता बरं वाटत होत...... मीरा आणि समीर तिला भेटायला रोजच हॉस्पिटल मध्ये येत.... येतांना.... भरपुर फळे, बिस्कीट घेऊन येत....आज त्यांच्या बरोबर दोन गोंडस मुलं देखिल होती.....मावशी! ही माझी मुलं हा मोठा मुलगा साहिल आणि ही छोटी ऋतुजा.......अस!... छान गोड आहेत दोन्ही.... शांता त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली......
आज शांताला डिश्चार्ज मिळणार होता... आजही मीरा आपल्या मुलांना घेऊन हॉस्पिटल मधे आली होती...... मावशी!... तुम्हांला तुमच्या भूतकाळातले काही आठवत नाही.....हे सगळं आमच्यामुळे घडले.... त्या बद्दल आम्हांला माफ करा!..... पण आमची एक विनंती आहे तुम्हांला.... जो पर्यंत तुम्हांला सगळं आठवत नाही तो पर्यंत तुम्ही आमच्या कडे रहा!...... मीराच बोलण ऐकून शांताचे डोळे पाणावले..... तिने होकारार्थी मान हलवली.....
मीरा ऐका छान मोठ्या बंगल्यात राहत होती....समीरने मीराच्या नावानेच कंपनी उघडली होती.... लग्न झाले तेंव्हा दोघांनीही खुप मेहनत करून कंपनी चांगल्या आर्थिक स्तिथीत आणली... व भरपुर नफा मिळवला..... मात्र मुलं झाल्या पासुन मीराला मुलांकडे लक्ष द्यायला लागत असल्याने ....समीर एकटा कंपनीच काम पाही.... त्यामुळे कंपनीला आधी नफा मिळायचा तो मिळत नव्हता.... मीराची खुप इच्छा असे... मदत करण्याची मात्र घराची जबाबदारी मुळे तिला शक्य होत नसे.....
शांताला आता मीराकडे दहा बारा दिवस झाले होते.... मीरा आणि समीर यांचा दोघांचाही स्वभाव अतिशय चांगला होता.... दोन्ही मुलं देखिल तिच्या जवळ खेळत... त्यामुळे शांता त्या घरात रुळली...
मावशीला सगळं व्यवस्थित बोलता येते....आपण बोललेले सगळं समजते....मात्र तिला मागचे काहीच आठवत नाही याचे मीराला आश्चर्य वाटे.... मात्र तिने बऱ्याच हिंदी चित्रपटात पाहिले होते की, याददाश गेल्या नंतरही हिरो हिरोईन..... व्यवस्थित बोलतात मात्र त्यांना मागचे काही आठवत नाही.... मावशीच्या बाबतीत तसंच असेल काही....असे तिला वाटे.......
आज समीर आणि मीरा घराच्या हॉलमध्ये बसुन काहीतरी चर्चा करत होते.....त्यांचे चेहरे गंभीर दिसत होते.... समीर आताच ऑफीस वरून आला होता..... म्हणून शांता त्याच्या साठी पाणी घेऊन आली.... त्या दोघांचे चिंताग्रस्त चेहेरे पाहुन शांताने विचारले काय झाले?.... तुम्ही इतके चिंतेत का?......
काही नाही मावशी आम्ही आमच्या कंपनीच्या कामाकाजा विषयी बोलत आहोत!....मीरा म्हणाली.... अस!... तुमचे चेहरे फार गंभीर दिसले म्हणुन विचारले बाकी काही नाही!... शांता काळजीच्या स्वरुपात म्हणाली.....मावशी!... आम्ही दोघं काम करायचो तेंव्हा कंपनी भरपूर नफ्यात होती.... पण मुलांच्या जवाबदारी मुळे मला आता कंपनी साठी वेळ देता येत नाही..... त्यामुळे कंपनी आता काहीशी कर्जबाजारी झाली आहे.... त्यासाठी आम्ही हा बंगला देखिल गहाण ठेवला आहे.... आणि हे असच चालत राहिले तर..... हे घर देखिल गमवावे लागेल.... म्हणून आम्ही दोन्ही मुलांना बोर्डिंग स्कूल मध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे .जेणेकरून मला कंपनीसाठी वेळ देता येईल. आणि आम्ही पुन्हा सगळं सुरळीत होईल...... म्हणून इच्छा नसताना मुलांना बोर्डिंग स्कूल मधे ठेवावेच लागेल....मीरा जड आवाजात म्हणाली...... बोर्डिंग स्कूलचे नाव ऐकून शांता काहीशी चपापली.....
बाई साहेब!..... मी काय म्हणते!.... तुम्हांला मुलांची काळजी आहे ना?..... मग मुलांना मी संभाळते.... आणि घरात देखिल लक्ष ठेवते..... तुम्ही कंपनीच्या कामात साहेबांना मदत करा....बाकीचे मी बघते.. मात्र मुलांना बोर्डिंगस्कूल मधे टाकू नका... बाई साहेब!..... शांता विनंती करत म्हणाली...
मावशी!... किती वेळा तुम्हांला संगितलेय मला बाईसाहेब म्हणू नका म्हणुन!.... मला मीरा याच नावाने हाक मारत जा!.... मी तुमच्या मुली सारखी आहे!....
दुसऱ्या दिवशी पासुन मीरा समीर बरोबर ऑफीसला जायला लागली.... संध्याकाळी घरी आल्यावर तिला घरात काहीच कराव लागत नसे.... रात्रीचा सगळा स्वयंपाक सगळा तयार असे..तोही एकदम रुचकर .....मुलांचा अभ्यास तयार असे..... घरात अतिशय चांगली साफसफाई कायम असे..... त्यामुळे घरात आल्यावर मीरा आणि समीरला प्रसन्न वाटे....मीराला आता घरात देखिल वेळ मिळे त्यामुळे ऑफीसची काही पेंडिंग कामे ती घरी देखिल घेऊन येई..... कसून मेहनत करून मीरा आणि समीरने महिनाभरातच कंपनीची गाडी रूळावर आणली.... याच सार क्रेडिट त्यांनी मावशीला दिल कारण त्यांच्याच मुळे हे शक्य झाल होत.....
आज मीराच्या घरात आनंदाचा दिवस होता..... कारण कंपनीच्या कर्जासाठी गहाण पडलेला त्यांचा बंगला त्यांनी सोडवला होता..... हा सगळा मावशीचा पायगुण तिच्याच मुळे हे शक्य झाल...अस समीर मीराचा ठाम विश्वास.... म्हणून आज सेलिब्रेशन म्हणून फेमिलीला घेवून संध्याकाळी फिरायला आणि बाहेर जेवायला जाण्याचे ठरले......
हॉटेल मध्ये जेवणाच्या टेबलवर बसताना मीरा म्हणाली.... मावशी!.... कोण कुठल्या तुम्ही? ...मात्र आमच्या जीवनात तुम्ही जेंव्हा पासुन आलात तेंव्हा पासुन आमच जीवनच पार बदलले.... मुलांना देखिल किती लळा लावला या काही दिवसांत तुम्ही!..... तुमच्या शिवाय मुलं राहत नाही.... नेहमीच आजी.. आजी..करत असतात.... मावशी!.... आज पासुन मी तुम्हांला मावशी नाही.... तर... आई म्हणून हाक मारेन!.....चालेल ना आई?..... आई... शब्द कानी पडताच.. ..शांताला गहिवरून आले..... आणि आपसूकच तिच्या.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले....... बाजुलाच बसलेल्या मुलांनी तिचे अश्रू पुसले..... अरे!... काही नाही पोरांनो!.... हे तर आनंदअश्रू आहेत...... शांता हासत म्हणाली...
आई!.......तुम्ही खरंच आमच्या साठी फार लक्की आहात!........तुम्ही मदत केल्यामुळं मीराला वेळ मिळाला... त्यामुळे महिना भरात हे सगळं केल.... तुम्हांला आम्ही आता कुठे जाऊ देणार नाही... आता तुम्ही कायम आमच्या सोबत रहायचे..... काय मुलांनो बरोबर ना?....समीरच्या या प्रश्नावर साहिल आणि ऋतुजाने टाळ्या वाजवल्या...... आणि हो! आणखी एक आई!.... तुमची काही इच्छा असेल तर सांगा!...मी नक्की पुर्ण करीन समीर म्हणाला..... माझी भापडीची ती ईच्छा काय असणार?...... तुम्ही सर्व मला इतक प्रेमाने वागवता मला अजुन दुसर काय हवं?......तरी आई!.. बोला तुमची काही इच्छा असेल तर... मी नक्की पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन...... समीर पुन्हा म्हणाला...... ठीक आहे!.... वेळ आली की सांगेन कधी...... पण सध्या माझी एकच इच्छा आहे.....की तुम्ही मला आई म्हणता आणि अहो जाहो देखिल करता.... आईला कोणी अहो जाहो करते का?...... शांताच्या या वाक्यावर सगळे हसले...... इतक्यात जेवण देखिल आले.... सगळ्यानी जेवणाचा आस्वाद घेतला....
मीरा आणि समीरच्या मेहनतीने काही महीन्यातच त्यांच्या कंपनीने शेअर मार्केट मध्ये मोठ नाव कमावले..... आता मीराच्या कंपनीचा टर्नओव्हर लाखोच्या घरातून करोडो मध्ये पोहचला.... यामुळे मीराच्या घरात आनंदी आनंद होता.... घरात आता मीराने दोन नोकर ठेवले... त्यामुळे शांताला आता पुर्ण आराम होता.... ती आपला पुर्ण वेळ आपल्या नातवंडा (मीराच्या मुलां) सोबत आनंदाने घालावीत होती.....
ऋतुजा व साहिलच्या आग्रह खातर एक दिवस शांता त्यांच्या आलिशान गाडीत त्यांना घेऊन ...समुद्रावर फिरायला गेली होती.......समुद्रावर फिरून झाल्यावर ऋतूजाने भेळ खणायचा हट्ट केला ....त्यामुळे तेथे असलेल्या भेळच्या गाडीवर ते गेले..... तिथे दोन लहान मुलं भेळ वरून भांडत होती..... कारण त्यांच्या कडे फक्त दहा रुपए होते.... ऐका भेळची किंमत दहा रुपए होती....आणि दोघांना वेगवेगळी भेळ हवी होती.....
अरे!.... पोरांनो भांडू नका!.... मी तुम्हांला घेऊन देते!... शांता त्यांना समजावत म्हणाली.....तशी ती शांत झाली... भैयाजी इनको दो भेल देना।.... पैसे मैं दुंगी।.....जी माता जी।....भेळवाल्यांने त्या मुलांना दोन भेळ बनवून दिल्या......
कोणी घेऊन दिल्या दोन भेळ?.... मोहन व त्याच्या बायकोने त्यांच्या मुलांना विचारले..... तेंव्हा त्यांनी भेळवाल्या गाडीकडे बोट दाखवले....... मोहन व त्याच्या बायकोला शांताकडे पाहुन धक्काच बसला..... कारण त्यांना वाटले होते की, त्या रात्री शांता बाहेर पाडली तेंव्हा ती आपल्या भावाकडे गेली असेल किंव्हा तिने जिवाच बरं वाईट केल असेल ........आता तिला पाहुन त्यांना वाटलं ती कुठेतरी घरकाम करत असेल.... आणि त्या मालकाच्या मुलांना फिरायला घेवून आली असेल......शांताला दुरून पाहुन ते तसेच निघुन गेले.....
घरी जावून मोहनच्या बायकोने ती गोष्ट माधव व त्याच्या बायकोला सांगीतली..... जाऊ दे ना!..... उलट पीडा टळली!......अस माधवची बायको म्हणाली.....
आजी!.... आज भेळ, पाणीपुरी.... आणि नारळपाणी पिवून मजा आली!.... थँक्यू ग्रेंड मा!.... छोटी ऋतुजा म्हणाली...
बाई साहेब!... घरी जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे... तिकडंन गाडी घेऊ?.... ड्रायव्हरने शांताला विचारले.... चालेल!.... ड्रायव्हरने गाडी शॉर्टकट घेतली.....
जरा गाडी बाजुला घ्या!.... ड्रायव्हर ने गाडी थांबवली...काय झाल ग्रेंड मा?....छोटीने विचारले... काही नाही असच!.... शांताने गाडीतूनच त्या घराकडे पाहिले.... शांताई अस नावं समोर गेटवरचच्या खांबावर नाव कोरले होते.......बाजुला एक बोर्ड लावला होता.... घर विकणे आहे.... आणि त्या खाली एक फोन नंबर होता..... शांताने तो नंबर लिहुन घेतला...... चला!.... गाडी पुन्हा चालु झाली....
मम्मी!... पप्पा!!.... आज ना आम्ही समुद्रावर खुप खुप मज्जाच मज्जा केली!.... ऋतूजा म्हणाली.... अग! आजी है। तो सब मुमकिन है बेटा!.... समीरच्या या वाक्यावर सगळी हसली..... मात्र शांता हसली नाही..... आई काहीतरी काळजीत आहे... अस मीरा आणि समीर दोघांनाही जाणवलं.... आई!... काय झाल?.....तु गप्प का?.... काही टेन्शन?.... समीरने विचारले...... नाही काही नाही!.... तुम्ही असल्यावर मला कसल टेन्शन?..... स्वतःला सावरत शांता म्हणाली.... तरी काहीतरी आहे जे तु लपवतेस! ...मीरा म्हणाली....
माझी एक इच्छा आहे!..... शांता काही विनवणी स्वरूपात...... अग! आई!! ...विनंती काय करतेस?....ऑर्डर दे तु!.... बोल काय इच्छा आहे तुझी!.......मला एक घर विकत घ्यायचे आहे!....अग आई मग त्यांत संकोच कसला?......तुझी इच्छा आहे ना?.... मग घेऊ की-...त्यांत काय विशेष?..... समीर म्हणाला....हो पण मला तेच घर पाहीजे जे मी पाहिलय!.... शांता तिने घेतलेला फोन नंबर समीरच्या हातात देत म्हणाली.....
समीरने लागलीच फोन करून उद्या अकराच्या भेटीची वेळ मागितली........तसेच त्यांच्या वकील साहेबांना देखिल पत्ता सांगुन.. भेटीची वेळ सांगीतली.....
दुसऱ्या दिवशी समीरची आलिशान मर्सडीज त्या गेटवर थांबली.... वकील साहेब गेटवर त्यांचीच वाट पाहत होते...... गाडी गेटमधनं आत आली.... मीरा व समीर त्या आलिशान गाडीतून उतरले.... घर जुन्या बांधणी पद्दतीच पण छान होते...... समोर बरीचशी जागा होती.... त्यांत छोटेखाणी मस्त अशी बाग होती.... मीराला देखील ते घर खूपच आवडले.....
नमस्कार मी मोहन!... या घराचा मालक!... ओ!.... मी समीर! ...मीरा कंपनीचा ओनर!...ही माझी पत्नी मीरा आणि हे आमचे वकील साहेब!..... अहो साहेब!... मीरा कंपनी माहीत नाही अस कोणी आहे का?.... खुप खुप नाव आहे तुमचे आज मार्केट मधे.......
हा माधव माझा लहान भाऊ... आणि या आमच्या पत्नी.....माझ्या आणि लहान भाऊ माधव... आमच्या दोघांच्या नावावर हे घर आहे!....मोहनने घराची थोडक्यात माहिती सांगीतली..... अस!.......काय किंमत म्हणालात या घराची?.....समीरने थेट विषयालाच हात घातला..... पाच कोटी!....हो!... पाच कोटी! ठरवलीय आम्ही या घराची किंमत!.....मोहन काहीसा अडखळत म्हणाला........समीरने एक नजर मीरा कडे फिरवली व तो म्हणाला... ओके! डन!!... आम्हांला डील मंजुर आहे!... वकील साहेब चेक तयार करा!..........कोणाच्या नावाने चेक बनवायचा? समीरने विचारले?....... आमच्या दोघांच्या नावाने... अडीच... अडीच... मोहन पुन्हा काहीसा अडखळत...
घराची कागदपत्र पाहुन लागलीच वकील साहेबांनी दोन चेक बनवले.... समीरने सह्या करून ते मोहन आणि माधवच्या हातात सुपूर्त केले.... हातात अडीच कोटीचा चेक पाहुन त्यांच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसला... त्यांच्या बायकांची तर तो चेक पाहुन दातखीळीच बसली जणू....... चला आम्ही निघतो धन्यवाद... समीर म्हणाला... यावर मोहन म्हणाला...... माफ करा समीर साहेब!... पण एक बोलु?..... हो! हो!! ... बोला ना!......समीर साहेब आपण इतके मोठे बिझनेसमॅन! ....मात्र आपल्याला डील व्यवस्थित करता येत नाही अस दिसल!.........कारण या घराची आम्ही चार कोटी किंमत ठरवली होती...... आम्ही साडे तीन.... किंव्हा शेवटी तीन कोटी वर देखिल आलो असतो...... मी तुम्हांला सहजच पाच कोटी अस म्हणालो आणि तुम्ही काहीही कमी नमी न करता डील मंजूर केली!......... मोहनच्या या बोलण्यावर समीर आणि मीराने एकमेकांकडे पाहुन हसले..... मिस्टर मोहन!..... डील मला नाही...तर तुम्हांला करता आली नाही!.... कारण या घराचे... पाच कोटी काय....दहा कोटी संगितले असते ना तरी आम्ही दिले असते......कारण हे घर आमच्या आईला आवडले आहे.... आणि तिला हे घर आम्ही भेट म्हणुन देणार आहोत!.... समजले मिस्टर मोहन!.......आता तुम्हीच सांगा बरं ..डील कोणाला जमली नाही ते?.......समीरच्या या वाक्यावर मोहन आणि त्याची फेमिली आवाक होऊन त्यांच्या कडे पाहत राहिली.... मग कधी खाली करताय घर?.... मीराने विचरले?.. अगदी उद्याच.!.......
दुसऱ्या दिवशी..... समीरची मर्सडीज गेट मधुन आली..... त्याच्या मागे आलिशान बी. एम. डब्ल्यू. होती......मोहन फेमिली ची सामान भरण्याची लगबग सुरू होती.... समीर मीरा व वकील साहेब त्यांच्या मर्सडीज मधुन उतरले.... त्यानंतर मागच्या बी. एम. डब्ल्यू .मधुन दोन लहान मुलांसोबत शांताला उतरताना पाहुन..... मोहन.. माधव व त्यांच्या बायकांची बोबडीच वळली.....
मिस्टर मोहन!... या आमच्या आई!.....आमच्या म्हणजे माझ्या आणि मीराच्याही.... आमच्या आईच्या मुळेच आम्ही यशाची शिखरे गाठली........आज आम्ही जे आहोत त्यांत आईचा मोठा हातभार आहे.... तिचीच इच्छा पुर्ण करण्यसाठी आम्ही हे घर घेतले!.... शांताने हात जोडुन मोहनला नमस्कार केला.....तसा चाचपडत त्यानेही तिला नमस्कार केला...
या आई!..... आत मधे घर बघु! समीर म्हणाला...... सगळे आतमध्ये घर पाहण्यासाठी गेले..... जातांना शांताने मोहन.. माधव... व त्यांच्या बायकांकडे एक नजर पाहिले..... मात्र त्यांना पाहुन शांताच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसले नाही........
शांता शेवटी आई होती...... कधी तरी तिच्या नांवावर असलेले घर तिच्या मुलांनी त्यांच्या नांवावर केले...... आज त्यांच्यावर ते घर विकण्याची पाळी आली....असंही ते घर दुसऱ्यांनी कोणीतरी विकत घेतले असते..... त्यामुळे समीरला ते घर विकत घ्यायला शांताने संगितले...... म्हणजे घर देखिल तिला मिळाले.... आणि तिच्या मुलांना त्याचे पैसेही ....आता त्या पैशात त्यानां काय काम धंदा करायचे ते करतील...... शेवटी आई ती आईच असते!...... तीच आपल्या मुलांवरच प्रेम कधीही कमी होत नाही.हेच खरं .......... आईच्या या कृत्याची समीर व मीराला काहीच कल्पना नाही....... कारण त्यांना माहिती आहे की,..... आईला आजही भूतकाळातील... काहीच आठवत नाही.........
(कथा मोबाईल वर टाईप केल्याने बऱ्याच चुका आहेत... त्या बद्दल माफी असावी...)
लेखन: चंद्रकांत घाटाळ